HW News Marathi
राजकारण

पुलवामा हल्ला हा मोदी-इम्रान खान यांचा कट, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याचा गंभीर आरोप

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथील भीषण दहशतवादी हल्ला हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा कट असल्याचा खळबळजनक आरोप यांना काँग्रेसचे वरिष्ठ नेते बी.के.हरीप्रसाद यांनी केला आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय वायू दलाने केलेल्या एअर स्ट्राईकवर गेल्या अनेक दिवसांपासून विरोधी पक्षांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत. सरकारने या एअर स्ट्राईकचे पुरावे द्यावेत अशी मागणी सध्या जोर धरत असल्याने राजकीय वातावरण ढवळून निघालेले असतानाच आता काँग्रेसकडून झालेल्या या गंभीर आरोपामुळे मोठा वाद पेटण्याची शक्यता आहे.

भारतीय हवाई दलाच्या १२ ‘मिराज २०००’ विमानांनी २६ फेब्रुवारी रोजी पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळांवर १००० किलोंचे बॉम्ब फेकले. यात जवळपास २५० ते ३०० दहशतवाद्यांच्या खात्मा करण्यात आल्याचे म्हटले जात असले तरीही अद्याप भारत सरकारकडून याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे विरोधकांकडून या एअर स्ट्राईकचे पुरावे मागितले जात आहेत. त्याचप्रमाणे आता भाजपसह पंतप्रधान मोदींवर यावरून गंभीर टीका होण्यासही सुरुवात झाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | तीनपैकी एका आरोपी डॉक्टरला अटक

News Desk

मनसेचा गटाध्यक्षांचा मेळावा; राज ठाकरे सभेत काय बोलणार?, याकडे सर्वांचे लक्ष

Aprna

अखेर नवाब मलिकांनी मागितली अण्णा हजारेंची माफी

News Desk