HW News Marathi
महाराष्ट्र

भोंग्यांनंतर आता कोल्हापुरात ‘रामायण’; हसन मुश्रीफांच्या ‘त्या’ पोस्टर्सवरून वाद

कोल्हापूर | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात केलेल्या भाषणाचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. त्यानंतरच्या उत्तरसभेत सुद्धा राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी राज्य सरकारला येत्या 3 मेपर्यंत अल्टीमेटम दिला आहे. मात्र, हा भोंग्याचा मुद्दा संपत नाही तोच आता आणखी एका विषयावर वाद पेटताना पाहायला मिळत आहे. हा नवा वाद ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेल्या पोस्टारवरून सुरू झाला आहे.

कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त पोस्टर्स छापण्यात आले असून या पोस्टर्सवरील मुश्रीफ यांच्या नावासोबत प्रभू श्रीराम यांचे नाव जोडण्यात आले आहे. हे पोस्टर्स अनेक ठिकाणी प्रसारित झाले असून वर्तमानपत्रात देखील जाहिराती देण्यात आल्या होत्या. मात्र, यावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला आहे. १० एप्रिल रोजी हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस असून त्याच दिवशी रामनवमी सुद्धा होती. याच निमित्ताने कार्यकर्त्यांनी हसन मुश्रीफांचे पोस्टर्स डिझाइन केले. हे पोस्टर्स कोल्हापूर दूध उत्पादक संघांच्या वतीने तयार करण्यात आल्याची माहिती आहे. तर या पोस्टर्समध्ये मुश्रीफ यांचे नाव श्रीरामांसोबत जोडले गेल्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे.

प्रभू श्रीरामांच्या नावाबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचे नाव जोडण्याचा जो प्रकार झाला आहे, तो अत्यंत निंदनीय आहे, असं  भाजप कोल्हापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी म्हंटलं आहे. “श्रद्धाळू बहुजन समाजाच्या भावना दुखावणारे हे कृत्य आहे. त्यांच्या या असंवेदनशील कृत्याविरुद्ध मी स्वतः कागल पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंद करणार आहे”, असं समरजितसिंह घाटगे यांनी म्हंटलं आहे. तसेच भविष्यात असे करण्याचे धाडस कोणी करू नये यासाठी माझा प्रयत्न असणार आहे, असंही समरजितसिंह घाटगे यांनी म्हंटलं आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आघाडीच्या नावात ज्याचं ‘शिव’हरवलं त्यांनी एनडीएमध्ये राम उरलाय का याची चर्चा करणं हास्यास्पद!

News Desk

राज्यातील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या !

News Desk

पत्रकार अर्णब गोस्वामींवर तातडीने कारवाई करण्यासाठी अरविंद सावंतांचे गृहमंत्र्यांना पत्र

News Desk