HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : पंतप्रधान नरेंद्र मोदीसह दिग्गज नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोरा भागात सीआरपीएफच्या ताफ्यावर दशतवाद्यांनी गुरुवारी (१४ फेब्रुवारी) झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले आहेत. शहीद जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रद्धांजली वाहिली आहे. या सर्व शहीद जवानांचे पार्थिव आज (१५ फेब्रुवारी) रात्री दिल्लीतील पालम विमानतळावर आणण्यात आले.

या ठिकाणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, संरक्षण मंत्री निर्मला सितारामन, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवार आणि तिन्ही दलाच्या सेनाप्रमुखांनी वाहिली श्रद्धांजली वाहिली आहे. या हल्ल्यातील ४० जवानांना शासकीय इतमामात निरोप देण्यात आला. या सर्व शहीद श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर जवानांचे पार्थिव त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी (१४ फेब्रुवारी) संध्याकाळी झालेल्या सर्वात मोठ्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले आहेत. पुलवामामध्ये झालेल्या हल्ल्याची जबाबादारी जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनाने घेतली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज कर्नाटक मंत्रिमंडळाचा विस्तार  

News Desk

आसाराम बापूला ह्रदयविकाराचा झटका, रुग्णालयात उपचार सुरू

News Desk

‘दिल्लीला ७०० मेट्रिक टन ॲाक्सिजन पुरवा’ सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला फटकारलं !

News Desk