HW News Marathi
राजकारण

कर्तव्यात कसूर करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा | आरपीआय

ठाणे | रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यावर अंबरनाथ येथे हल्ला करण्याचा निषेधार्ह प्रकार घडला.त्या दौऱ्यात रामदास आठवले यांच्या सुरक्षेत त्रुटी ठेवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या जबाबदार पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी तसेच या हल्ल्यामागील सूत्रधार शोधून काढावा या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने येत्या शुक्रवार दिनांक ४ जानेवारी रोजी संपूर्ण ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तीव्र निदर्शने आंदोलन करण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय सचिव ठाणे प्रदेश रिपाइंचे निरीक्षक सुरेश बारशिंग यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या पत्रकार परिषदेस सुरेश बारशिंग यांच्या समवेत ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष रामभाऊ तायडे उपस्थित होते. केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले हल्ला प्रकरणी जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवरनिलंबनाची कारवाई करावी या मागणीसाठी रिपाइंच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. भेट घेऊन १७ दिवस झाले तरी अद्याप एकाही जबाबदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालेली नाही. याबाबत रिपब्लिकन पक्षात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

रामदास आठवले यांच्यावर हल्ला घडविण्यामागे कोण सूत्रधार आहे याचा कसून शोध पोलिसांनी घेतला पाहिजे. त्याबाबत अद्याप तपासात कोणतीही प्रगती झालेली दिसत नाही.ना रामदास आठवलेंवर हल्ला घडविण्याचे कारस्थान कुणाचे आहे हे तापसयंत्रणांनी त्वरित शोधले पाहिजे अशी मागणी सुरेश बारशिंग यांनी केली आहे. याबाबत येत्या दिनांक ४ जानेवारी ठाणे प्रदेश आणि पालघर जिल्ह्यात रिपाइं तर्फे आंदोलन छेडण्यात येणार असल्याची घोषणा रिपाइं तर्फे अधिकृतपणे आज रिपाइं चे सचिव सुरेश बारशिंग यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : भाजपची चौथी यादी जाहीर, ६ राज्यांच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा

News Desk

संकटमोचक गिरीश महाजन !

News Desk

कोटक यांच्या प्रचारात सोमय्या सहभागी झाले तर शिवसैनिक त्यांचा प्रचार करणार नाहीत !

News Desk
मुंबई

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

News Desk

मुंबई | जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘जाणीव वसुंधरेची ‘ या प्रकल्पा अंतर्गत लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग हॉस्पिटल, वसई येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जाणीव ट्रस्टचे पदाधिकारी, साठ्ये महाविद्यालयाच्या NSSयुनिट व Ncc युनिटचे विध्यार्थी, साठ्येचे माजी विद्यार्थी , वर्तक कॉलेज, सेंट पीटर्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज अशा विविध संस्थांमधून १२५ विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

यावेळी ३७० झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये मोगरा व आंबा या झाडांचा समावेश होता. लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मुलन संस्था यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली होती . डॉ जगदीश सामंत यांना आदरांजली वाहून सर्व स्वयंसेवकांना विविध गटांमध्ये विभागणी करून झाडे व हत्यारे घेऊन सर्वजणांनी सकाळी साडेदहा च्या सुमारास वृक्षारोपणाला सुरवात केली. दीड वाजेपर्यंत वृक्षारोपण केले व सर्वांनी तेथे एकत्रित भोजनाचा आनंद घेतला व पुन्हा जोमाने साडेचार वाजेपर्यंत वृक्षारोपण केले, त्यानंतर लोकनायक ट्रस्टच्या ट्रस्टींनी मुलांशी सुसंवाद साधत वृक्षारोपणाची आपल्याला प्रदूषणावर तसेच ग्लोबल वॉर्मिंग वर मात करण्यासाठी आज आपण केलेले काम किती प्रशंसनीय आहे हे सांगत आपण सर्वांनी लावलेल्या झाडांची जवाबदारी संस्था घेईल व आपण सर्वांनी वेळात वेळ काढून येथे येऊन झाडांची काळजी घ्यावी याची सर्वांना जाणीव केली, सर्व उपस्थितांनी ही जवाबदारी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले, त्यानंतर सुनिल पाठक (ट्रस्टी, जाणीव) यांनी डॉ सामंत यांचा वसा आपण चालवत आहोत असे सांगत सर्वांना ट्रस्ट व ट्रस्टच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाच्या नियोजन व त्यामागील उद्दिष्टांची सर्वांना माहिती दिली.

मुंबई जिल्हा समन्वयक NSS विनोद गवारे (सहाय्यक प्राचार्य साठ्ये महाविद्यालय) यांनी उस्फुर्तपणे प्रेरणागित घेत आपली व समाजाच्या प्रति असलेली बांधिलकी दाखवून दिली. प्रा बबन मोहिते, सचिन शिगवण व प्रा गौरांग राजवडकर , प्रा कस्तुरी मेढेकर (साठ्ये महाविद्यालय), जिल्हा समन्वयक प्रा भीमराव पेडकर वर्तक कॉलेज, प्रा वैती सेंट पीटर कॉलेज, प्रा अभ्यंकर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले, जाणीव ट्रस्ट च्या वतीने सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. जाणीव ट्रस्टच्या सुनील पाठक यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी योगेश पाटील, डॉ परुळेकर (लोकनायक जयप्रकाश नारायण ट्रस्ट) व राम परब, आरती पाठक (ट्रस्टी जाणीव) आणि मयूर पवार या सगळ्यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

Related posts

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

Manasi Devkar

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

Gauri Tilekar

पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा २३ पैशांची वाढ

News Desk