HW News Marathi
देश / विदेश

धुक्यामुळे हरयाणामध्ये भीषण अपघात

नवी दिल्ली | हरयाणामध्ये शनिवारी सकाळी दाट धुक्यामुळे ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घडली आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला तर पाच जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

हरयाणातील अंबाला-चंदीगड मार्गावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला आहे. पोलिसांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, चंदीगडवरून येणाऱ्या दोन कारला एका ट्रकने जोरदार धडक दिली. दाट धुके असल्याने हा अपघात झाला आहे.

या पुर्वी देखील हरयाणामध्ये दाट धुक्यामुळे ५० गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला होता. रोहतक-रेवारी हायवेवर सोमवारी झालेल्या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नारायण राणे फडणवीस आणि दरेकरांसह दिल्लीहून कोकणासाठी रवाना!

News Desk

पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरूच, एक भारतीय जवान शहीद

News Desk

शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाकडे चिन्हांचा प्रस्ताव सादर

Aprna
महाराष्ट्र

बिफ बाळगणे गुन्हा ठरणार नाही, उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला धक्का

News Desk

नवी दिल्लीः बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरत नाही, असेमुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले असून यामुळे राज्यसरकारला मोठा धक्का मानला जात आहे.

राज्य सरकारने १९९५ च्या पशु संवर्धन कायद्यात दुरुस्ती केली असून बीफ जवळ बाळगणे गुन्हा समजण्यात येईल, असे म्हटले होते. मात्र, हा प्रकार म्हणजे खासगीपणाचे उल्लंघन असल्याची टिप्पणी करत उच्च न्यायालयाने ही तरतूद रद्द ठरवली होती. बीफ जवळ बाळगणे गुन्हा ठरवण्याची तरतूद घटनाविरोधी आहे, असेही न्यायालयाने नमूद केले होते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे राज्यसरकारच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

Related posts

राजकीय पक्षांनी संपर्काचा तपशील त्वरित सादर करावा; राज्य निवडणूक आयोगाचे आवाहन

News Desk

पुण्याच्या उद्योजकाच्या पुढाकारातून सिंगापूरहून येणार ३५०० व्हेंटीलेटर्स

News Desk

‘अजित पवारांनी पुण्याची वाट लावलीय’, निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्ला

News Desk