HW News Marathi
राजकारण

आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला आव्हान

मुंबई | मराठा आरक्षणानंतर आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला देखील आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारचा अभ्यास न करता ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आले आहे. ओबीसी समाजाला आवश्यकतेपेक्षा जास्त आरक्षण देण्यात आल्याने ते कमी करण्यात यावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आलेली आहे. बाळासाहेब सराटे यांनी ही याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. बाळासाहेब सराटे हे मराठा आरक्षणाचे अभ्यासक असल्याची माहिती मिळत आहे.

मराठा आंदोलकांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी केली होती. मात्र, ओबीसी समाजाला दिल्या गेलेल्या आव्हानामुळे या समाजाकडून आक्रमक प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. ओबीसी समाजाला दिल्या गेलेल्या आरक्षणाचा सर्वेक्षणाद्वारे तपस करून या समाजातील जातींचे आर्थिक आणि सामाजिक मागासलेपण पुन्हा एकदा तपासून पाहण्याचे निर्देश राज्य मागासवर्ग आयोगाला देण्यात यावेत, अशी प्रमुख मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

मराठा आरक्षणाचा कायदा देखील १ डिसेंबर २०१८ पासून राज्यभरात लागू करण्यात आला. या आरक्षणाला कोणतीही व्यक्ती, संस्था, संघटनेकडून न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते ही बाब लक्षात घेऊन राज्य सरकारने ३ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले. त्यानंतर लगेचच अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आरक्षणाला आव्हान देणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली. सरकारने ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देणे हे घटनाबाह्य आहे, असे सांगत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविरोधात ही याचिका दाखल केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

१० ऑगस्टला भाजपची दुसरी मेगाभरती

News Desk

आता मुंबईचे डबेवाले देखील अयोध्येला जाणार

Gauri Tilekar

दिवाळीत ‘या’ मार्केटमध्ये करा खरेदी…

News Desk
मुंबई

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk

मुंबई – परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तसेच या भागात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.पोलिसांनी धरपकड सुरु केल्यानंतर जमाव पांगला. सध्या छात्रभारतीचे कार्यकर्ते गोरेगावच्या दिशेने जात आहेत.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

Related posts

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk

मोनोरेलमध्ये टक्कर , दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

News Desk