HW News Marathi
राजकारण

#RamMandir : अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभारू नये !

लखनऊ | समाजवादी पार्टीतून बाहेर पडून प्रगतिशील समाजवादी पार्टीची (लोहिया) स्थापना करणाऱ्या शिवपाल यादव यांनी राम मंदिराबाबत एक मोठे विधान केले आहे. “अयोध्येत बाबरी मशिदीच्या जागेवर राम मंदिर उभारू नये. त्यापेक्षा सरयू नदीच्या किनाऱ्यावर राम मंदिर बांधावे,” असे विधान शिवपाल यादव यांनी केले आहे. “सांप्रदायिक वाद पुन्हा निर्माण होत आहेत. मला असे वाटते कि मला संघर्ष करावा लागेल”, असेही शिवपाल यादव यावेळी म्हणाले. शिवपाल यादव यांनी रविवारी (९ डिसेंबर) लखनऊ येथील रमाबाई मैदानात जनआक्रोश रॅली आयोजित केली.

“भाजप सरकारमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. देशावर संकट आहे. भाजप सरकारला सत्तेतून हटविण्यासाठी आम्ही जनआक्रोश रॅली काढली आहे. आज दलित, मागास, शेतकरी, तरुण एकत्र आले आहेत. हा एक ऐतिहासिक दिवस आहे. ही जनआक्रोश रॅली निर्णय आणि परिवर्तनासाठी काढण्यात आली आहे”, असेही यावेळी शिवपाल यादव यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सफाई कर्मचाऱ्यांचे पाय धुतले

News Desk

‘मुख्यमंत्री हजर नसताना तुम्ही कसले भूमीपूजन करत होतात ?’

Gauri Tilekar

वैयक्तीक डेटा चोरीसाठी सरकारने आधार कार्ड केले सक्तीचे

News Desk
राजकारण

#RamMandir : राम मंदिर अयोध्येत नाही तर मग मक्का-मदिनेत उभारणार का ?

News Desk

नवी दिल्ली | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून वातावरण प्रचंड तापले आहे. “श्रीराम हे संपूर्ण विश्वाचे आहेत तर मग त्यांचे मंदिर अयोध्येतच का ?”, असा सवाल जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे प्रमुख फारुक अब्दुल्ला यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. फारुक अब्दुल्ला यांच्या या प्रश्नाला केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी प्रतिप्रश्न केला आहे. “मक्काच्या ऐवजी हज दुसऱ्या जागी नेण्यात आले तर तुम्हाला चालेल का ?”

एवढेच नव्हे तर “राम मंदिर अयोध्येत नाही तर मग काय मक्का-मदिनेत उभारणार का ?’ असा खोचक सवाल देखील गिरीराज सिंह यांनी केला आहे. दरम्यान, गिरीराज सिंह यांनी फारूक अब्दुल्ला यांना दिलेल्या प्रत्युत्तरामुळे हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच अयोध्या राम मंदिर उभारणीबाबत बोलताना गिरीराज सिंह यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. “सरकारच्या नव्हे तर देशातील १०० कोटी हिंदूंच्या हिंमतीवर राम मंदिर उभारण्यात येईल”, असे गिरीराज सिंह यांनी म्हटले आहे.

Related posts

आण्णा हजारेंचे चंद्रकांत दादांना पत्र

swarit

पहिल्या टप्प्यातील मतदान सुरू, यवतमाळमध्ये ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड

swarit

गुवाहाटीसंदर्भात केलेल्या वक्तव्यावर रवी राणांची दिलगिरी; तर बच्चू कडू उद्या भूमिका मांडणार

Aprna