HW News Marathi
राजकारण

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाविरोधात ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

हिंगोली | शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील नेत्यांमधील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी कळमनुरीचे आमदार संतोष टारफे यांच्याबद्दल बोलताना शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष बांगर यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानामुळे हिंगोलीत तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर टारफे यांनी बांगर यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

तसेच बांगर यांच्या अटकेसाठी टारफे यांनी हिंगोलीत आंदोलन केले. बांगरविरोधात काढलेल्या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात लोक सहभागी झाले होते. तर दुसरीकडे खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप करीत सेनेकडून औंढा,कळमनुरी भागात बंद पुकारला आहे.

नेमके काय आहे प्रकरण

२९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ च्या दरम्यान औंढा तहसिल कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जाहीर सभेत जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांनी जातीवाचक शिविगाळ केल्याचे निदर्शनास आले. ध्वनीक्षेपणावर दोन ते अडीच हजार लोकांसमोर अर्वाच्च भाषेत शिविगाळ करुन फिर्यादीचा अवमान केल्या प्रकरणी औंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिक्षक सिध्देश्वर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चंद्राबाबूंच्या उपोषणादरम्यान एकाची आत्महत्या

News Desk

मंदिर-मस्जिद यांना मदत करण्याऐवजी त्यांच्या तिजोरीवरच सरकार हात मारतेय !

swarit

शिंदे गटाला घटनापीठाचा मोठा दिलासा! पक्षचिन्हाबद्दलचा निर्णय निवडणूक आयोग घेणार

Aprna
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला

swarit

जम्मू-काश्मीर | शोपियाँ जिल्ह्यातील अरहामा येथे दहशतवाद्यांनी पोलिसांवर हल्ला केला आहे. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पोलिसांच्या पथकावर हल्ला केला. या हल्ल्यात ४ पोलीस जवान शहीद झाले आहेत. दहशतवाद्यांनी पोलिसांकडील शस्त्र हिसकावून पळ काढल्याचे माहिती मिळाली आहे. घटनास्थळी पोलीस आणि लष्कराचे जवान दाखल झाले आहेत. जवानांनी संपूर्ण परिसराला घेराव घातला असून दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.

तसेच हिजबुल या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना काश्मीरमधील अनंतनाग येथे सुरक्षा रक्षकांनी ठार केले होते. यात हिजबुल संघटनेचा अल्ताफ अहमद डार उर्फ अल्ताफ कचरू आणि त्याचा साथीदार उमर राशित या दोघांना जवानांनी ठार केले. या दोन्ही दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलीसांवर हा हल्ला करण्यात आले, असल्याची माहिती मिळाली आहे.

Related posts

जम्मू काश्मीरमधील इंटरनेट बंदीचा सात दिवसांत आढावा घ्यावा, सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk

राम मंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना दिले

News Desk

अदानी कंपनीचे मुख्यालय मुंबईतून गुजरातला हलवले

News Desk