HW News Marathi
राजकारण

#MarathaReservation : आरक्षणाला स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाचा स्पष्ट नकार

मुंबई | मराठा आरक्षणाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मराठा समाजाच्या आरक्षणाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर अद्याप कोणताही निर्णय देण्यात आलेला नाही. दरम्यान, १० डिसेंबरपर्यंत या याचिकेवरील सुनावणी तहकूब करण्यात आली आहे. सोमवारी (१० डिसेंबर) अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या याचिकेसह यासंदर्भातील अन्य याचिका देखील निकाली काढण्यात येतील.

या सर्व याचिकांवरील सुनावणी मुख्य न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. आज मराठा आरक्षणाविरोधात न्यायालयात रिट याचिका दाखल करणाऱ्या अॅड.जयश्री पाटील यांचे वकील अॅड.गुणरत्न सदावर्ते आज न्यायालयात अनुपस्थित राहिल्याने मराठा आरक्षणावर तातडीने सुनावणी घेण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. मात्र, दुपारी ३ वाजता न्यायालयाने यावरील सुनावणी पूर्ण केली.

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठीची संवैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून या विधेयकाचे कायद्यात रूपांतर करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाचा कायदा १ डिसेंबर २०१८ पासून संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात आला आहे. दरम्यान, परंतु तरीही कोणत्याही संस्था, संघटनकडून न्यायालयात या आरक्षणाविरोधात आव्हान याचिका दाखल केली जाऊ शकते ही शक्यता लक्षात घेऊन राज्य सरकारने सोमवारी (३ डिसेंबर) सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सुशीलकुमार शिंदेंची उमेदवारी निश्चित, राहुल गांधी लवकरच सोलापूर दौऱ्यावर

News Desk

प्रांतीय अस्मितेचे जनक बाळासाहेब ठाकरेच !

News Desk

मोदी सरकारच्या विमान प्रवास खर्चात लक्षणीय घट

News Desk
राजकारण

#RamMandir : …तर दिल्लीपासून काबूलपर्यंत दंगली घडवू !

News Desk

नवी दिल्ली | राम मंदिराची निर्मिती झाली तर दिल्ली ते काबूलपर्यंत हिंसाचार माजवू दंगली घडवू, असा इशाराच जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहरने दिला आहे. “आम्ही मुस्लिम बांधवांसाठी मशीद पुन्हा उभारू. ती जागा मशिदीची आहे त्यामुळे त्या जागेवर राम मंदिर बांधले जाऊ नये. जर राम मंदिर त्या जागी बांधले गेले तर दिल्लीपासून काबूलपर्यंत हिंसाचार माजवू, दंगली घडवू”,अशी इशारावजा धमकीच मसूद अजहरने दिली आहे.

“बाबरी मशीद आमच्याकडून हिसकावून त्या जागेवर तात्पुरत्या स्वरूपाचे मंदिर बांधण्यात आले. आता या जागेवर रामाचे भव्य मंदिर बांधण्याची मागणी होते आहे. जे अशी मागणी करत आहेत त्यांच्या हाती तलवार आणि त्रिशूळ आहे. तर मुस्लिम बांधव घाबरलेले आहेत. आमच्यासाठी हा परीक्षेचा काळ आहे”, असे अझरने म्हटले आहे.

दरम्यान, ‘राम मंदिर उभारण्यास आम्ही वचनबद्ध आहोत. राम मंदिरावरून मसूद अजहर आम्हाला धमकी देत असेल तर पुढच्या सर्जिकल स्ट्राइकवेळी त्याच्यासारख्या दहशतवाद्यांचाच खात्मा केला जाईल,’ असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

Related posts

‘बोले तैसा चाले’ असे झाले नाही तर लोक झोडपून काढतात !

News Desk

“तुम्ही सिलेक्टीव्हच ऐकता…”, मुख्यमंत्र्यांचा अजित पवारांना टोमणा

Aprna

संभाजी भिडेंनी महिलांसंदर्भात केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर अमृता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या…

Aprna