HW News Marathi
राजकारण

मोदी सरकार सर्जिकल स्ट्राईकचे भांडवल करते !

जयपूर | सर्जिकल स्ट्राईकसारख्या संवेदनशील मुद्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकीय भांडवल करीत असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजस्थान येथील प्रचारसभेत केला. राहुल यांनी सर्जिकल स्ट्राईकवरून मोदींवर निशाणा साधला.

म्हणाले की, काँग्रेसच्या काळात व्याप्त काश्मिरात घुसून तीन वेळा सर्जिकल स्ट्राईक करण्यात आले होते. आमच्या सरकारने याबाबत कधीही वाच्यता देखील केली नाही. मोदी सरकार मात्र लष्कराने २०१६ साली केलेल्या सर्जिकल स्ट्राईकचा राजकीय लाभ उठविण्याचा प्रयत्न करत आहे. रोजगार आणि विकासाच्या मुद्यावर अपयशी ठरल्यामुळेच मोदी सरकार जवानांच्या शौर्यावरही डल्ला मारीत असल्याची टीका राहुल यांनी केली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये मोदींना पराभव दिसत होता. त्यामुळे मोदींनी सैन्याच्या कारवाईचा राजकीय लाभ घेतला, असेही राहुल यांनी यावेळी सांगितले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी मंत्रिमंडळाला एका खोलीत बंद केले आणि मग हा निर्णय जाहीर केला. या निर्णयामुळे दोन लाख लोकांना उद्ध्वस्त केले, असे राहुल यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#LokSabhaElections2019 : अभिनेत्री उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसमध्ये प्रवेश

News Desk

कसायाच्या दारात उभ्या केलेल्या भाकड, भेदरलेल्या बैलासारखे नेते देश काय सांभाळणार ?

News Desk

राहुल गांधी भाजप नेत्यांपेक्षाही जास्त वेळा मोदींचे नाव घेतात !

News Desk
देश / विदेश

आसाममध्ये बॉम्बस्फोट, 11 लोक जखमी

News Desk

नवी दिल्ली | आसाममध्ये एका एक्स्प्रेस ट्रेनमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाल्याची घटना शनिवारी रात्री घडली आहे. या ब्लास्टमध्ये काही नागरिक जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार हा बॉम्ब स्फोट आसाममधील हरसिंगा रेल्वे स्थानकात झाला आहे. हा ब्लास्ट एक्सप्रेस ट्रेनच्या एका कोचमध्ये झाला आहे. या स्फोटाची तीव्रता कमी असल्याची माहिती प्रथम दर्शनी वर्तविण्यात येत आहे.

ब्लास्ट ची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले आहेत. रेल्वेचे मुख्य अधिकारी देखील घटना स्थळी हजर झाले आहेत.जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. हा स्फोट कामाख्या डेकारगांव इंटरसिटी एक्स्प्रेस मध्ये झाला आहे. आता पर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार 11 लोक जखमी झाले आहेत.

डीआयजी अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार एक पोलीस पथक घटनास्थळी रवाना करण्यात आलेले आहे. पोलीस सदर घटनेचा तपास घेत आहेत.

Related posts

नोटबंदीनंतर देखील निवडणुकीत काळ्या पैशाचा वापर !

News Desk

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही !

swarit

दाऊदची संपत्ती जप्त करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

News Desk