HW News Marathi
राजकारण

मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे ?

मुंबई | मराठा समाजाला आरक्षण मिळाले. धनगर समाजाबाबत सकारात्मक आहात मग मुस्लिम समाजावर सरकार अन्याय का करत आहे, असा सवाल विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केला.

राज्यातील मुस्लिम समाज घटकामध्ये शिक्षणाचे प्रमाण खूप कमी आहे. कालच सर्वानुमते मराठा समाजाला आरक्षण देण्याचे विधेयक मंजुर करण्यात आले आहे. तर धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सकारात्मक आहे. मात्र मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार का बोलत नाही.

राज्य सरकारने मुस्लिम समाजावर अन्याय केला आहे. उच्च न्यायालयाने ५ टक्के शैक्षणिक आरक्षणाचे मान्य नाही केले. परंतु स्थगितीही दिली नाही. जेव्हा स्थगिती मिळत नाही त्यावेळी तो निर्णय सकारात्मक असतो. त्यामुळे तो निर्णय झाला तर तो चांगला संदेश महाराष्ट्रात जावू शकतो. त्यामुळे सरकारने तशी भूमिका घ्यावी अशी आग्रही मागणीही अजित पवार यांनी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

काँग्रेस विधानसभेत मनसेसोबत आघाडी करणार नाही !

News Desk

ग्रामविकासाचा ध्यास असणारा नेता हरपला | आठवले

News Desk

“कर्नाटक राज्यातील नेत्यांचे वक्तव्य म्हणजे ‘उलटा चोर कोतवाल को डाटे”, छगन भुजबळांचा टोला

Aprna
राजकारण

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्यांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दया !

News Desk

मुंबई | वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत पावलेल्या लोकांना जसे १५ लाखाची मदत दिली जाणार आहे तशीच मदत सरकारने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना व मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या ४२ जणांच्या कुटुंबियांना १५ लाखाची मदत दयावी अशी मागणी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात केली.

मराठा विधेयक सभागृहात मंजुर करण्यात आले. त्याचे स्वागतही केले परंतु राज्याचे प्रमुख सभागृहात आहेत. याच सभागृहामध्ये राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शब्द दिला होता. अवनीच्या हल्ल्यात मृत झाले त्यांना १० ते १५ लाखाचे अर्थसाह्य देण्याचा निर्णय घेण्यात आला आणि वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जनावरांचा मृत्यू झाल्यास त्यांची भरपाई ६० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.

काल जसा मराठा विधेयक मंजुर करण्यात आले. सकल मराठा समाजाने ५८ मोर्चे काढले. परंतु हे सगळं करत असताना ४२ जणांनी आपला जीव गमावला. जर वन्यप्राण्यांनी माणसाला मारले तर १५ लाख रुपये देता. तसे त्या ४२ जणांच्या कुटुंबांना प्रत्येकी १५ लाखाची मदत दया. मोर्चे काढल्यामुळे १५ हजार तरुणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. ते गुन्हे मागे घ्यावे आणि विषय संपवून टाकावा. प्रत्येक जिल्हयात वसतीगृहाचा मुद्दा तात्काळ सोडवावा. विधेयकाचा प्रश्न संपला परंतु हे काही विषय आहेत त्याकडे सरकारने तात्काळ लक्ष दयावा अशी मागणीही अजित पवार यांनी केली.

मराठा आंदोलनामध्ये ज्याच्या घरातील कर्ती व्यक्ती गेली त्याच्या घरातील एकाला नोकरी दयावी. सरकारला हे करणं कठिण नाही. यालाच अनुसरुन राज्यातील जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांच्या कुटुंबाला सरकार फक्त एक लाख रुपये देते. खरंतर शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये, त्यांनी आत्महत्या करु नये म्हणून त्यांची कर्जमाफी असेल किंवा आधारभूत किंमत दीडपट असेल तिही दिली पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

Related posts

दानवेंना सत्तेचा माज आलाय | खोतकर

News Desk

लोकांची दिशाभूल करणे ही भाजप सरकारची पद्धत !

News Desk

रजनी पाटील यांचे निलंबन मागे घेण्याच्या मागणीवरून विरोधकांचा राज्यसभेत गोंधळ

Aprna