HW News Marathi
मुंबई

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत

कल्याण | मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. कल्याण-विठ्ठलवाडी मार्गावर रेल्वे रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेची डाऊन मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून कर्जत-खोपोलीकडे जाणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. मंगळवारी (२७ नोव्हेंबर) सकाळी ६.१५ वाजेदरम्यान ही घटना घडली आहे.

हा बिघाड दुरुस्त करण्यात आला असला तरीही मध्य रेल्वेची वाहतूक १५ मिनिटे उशिराने सुरू आहे. ऐन कार्यालय गाठण्याच्या वेळेस हा खोळंबा झाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. सोमवारी (२६ नोव्हेंबर)ला सायंकाळी टिटवाळा-आंबिवली मार्गावर सिग्नल यंत्रणा फेल झाल्याने मध्य रेल्वेच्या प्रवाशांना रात्री देखील फटका बसला असतानाच मंगळवारीही सकाळी मरेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

स्वातंत्र्यवीर सावरकर हे क्षात्रतेज आणि राष्ट्रासाठी प्रेरणा पुरुष !

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

News Desk

मुंबई विद्यापीठाची प्रवेशपूर्व ऑनलाईन नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू

News Desk