HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभुमीवर हाय अलर्ट

नवी दिल्ली | जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची भीती स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली आहे. यामुळे दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांची ठिकठिकाणी छायाचित्रे लावण्यात आली असून पोलिसांकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा म्हणून या दहशतवाद्यांना कोठेही पाहिल्यास त्याची माहिती तातडीने सांगण्यात यावी, असे आवाहन केले आहे.दहशतवाद्यांना पाहिले तर पहाडडगंज पोलीस स्टेशनच्या ०११-२३५२०७८७ आणि ०११-२३५२४७४ या दोन संपर्क क्रमांकवर कळविण्यात यावे असे आवाहन केले आहे.

पंजाबमध्ये रविवारी (१८ नोव्हेंबर)ला अमृतसर येथे निरंकारी भवनावर ग्रेनेड हल्ला झाला होता. या हल्ल्यात तीन जणांचा मृत्यू झाला असून १५ जण जखमी झाले आहेत. हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी पंजाबसहीत नवी दिल्लीत हाय अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.अमृतसरी हल्लात वापरण्यात येणारे ग्रेनेड हे पाकिस्तानी सैन्याकडून करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती तपासात उघड झाली आहे. यामुळे हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

चीनीमधील भूकंपात १०० ठार

News Desk

फेसबुक ओळखणार तुमचे नैराश्य!

News Desk

केरळच्या मदतीसाठी यूएईचा हात

swarit
क्राइम

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

News Desk

येवला | येवला-मनमाड मार्गावर इर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एका कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात येवला-मनमाड मार्गावरील अनकाई बारीजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात इर्टिंगा कारचा अक्षरश: चुराडा झाला.

या कारमधील जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण नगर आणि कोपरगाव येथील रहिवासी होते. मृतांमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आयशर गाडी मनमाडच्या दिशेने जात होती, तर इर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

 

 

Related posts

धुळ्यात पाच जणांची हत्या, २३ जणांना अटक

News Desk

उंडेगावमधील चोरी प्रकरणी वडील फिर्यादी तर मुलगाच निघाला आरोपी

Manasi Devkar

गावातील अवैध दारु बंद करण्याचे ग्रामरक्षक दलाला अधिकार

News Desk