HW News Marathi
महाराष्ट्र

पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही, तुम्ही तुमची कबर महाराष्ट्रात खोदली, राऊतांची भविष्यवाणी

मुंबई | “पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही. यांची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खोदली आहे,”अशी भविष्यवाणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपसंदर्भात केले आहे. राऊतांनी दिल्लीतून आज (७ एप्रिल) मुंबईत दाखल झाले आहेत. यावेळी राऊतांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने शिवसैनिक विमानतळावर ढोल-ताशेच्या गजरात त्यांचे स्वागत केले. 

राऊत म्हणाले, “शिवसेनेची जी आक्रमकता आज दिसली ती पुढे देखील अशीच राहिल का?, राऊत म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून भाजप राज्यातून जो आमच्यावर हल्ले करतो. ते फार काय करू शकतात. हे आम्ही आदिच सांगितले आहे. आम्हाला तुरुंगात पाठवले, तर आम्ही तयार आहे. आमच्यावर खुनी हल्ले करतील, आमची तयारी आहे. आम्हाला ठार मारतील, आमची तयारी आहेत. पण लक्ष्यात घ्या. या पुढील २५ वर्ष भाजपचे राज्य महाराष्ट्रात येणार नाही. यांची व्यवस्था तुम्हीच करून ठेवली आहे. तुम्ही तुमची कबर या महाराष्ट्रात खोदली आहे. आणि ही कबर देशातसुद्धा खणली जाईल. जर आपण अशा प्रकारचे वर्तन ठेवले तर राजकीय विरोधक हा विचाराने सामना करायचा प्रकार असतो. पण तुम्ही केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर करून, सगळ्यांना उद्धवस्त करून पहात असाल. यात तुम्ही सुद्धा उद्धवस्त झाल्याशिवाय राहणार नाही. आम्ही कालपासून आयएनएस विक्रांत या कोट्यावधीच्या घोटाळ्यावर बोलत आहोत. आणि भाजपचे प्रमुख लोक ज्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा होती. हे विक्रांत घोटाळा करणाऱ्याला जाब विचारत नाही. पण, आयएनएस विक्रांत घोटाळा करणाऱ्याच्या बाजुने उभे आहेत. हा निर्ल्लजपणाचा कळस आहे.”

लोकांच्या मनातील चिड आणि संताप – राऊत

 “हे समर्थन किंवा शक्तप्रदर्शन नाही, ही शिवसेना आहे. ही लोकांच्या मनातील चिड आणि संताप आहे. माझ्यासोबत विनायक राऊत आहे. आम्ही कालपासून चर्चा करत आहोत. आज आयएनएस विक्रांतचा जो घोटाळा आपल्या मराहारष्ट्रात भाजपच्या नेत्यांकडून झाला आहे. आपण पाहिला असेल, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने राज्यातील गावपातळीवर शिवसैनिकांचे आंदोलन झाले. ज्या पद्धतीने महाविकासआघाडीच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिवसेनेवर वा इतर नेत्यांवर हल्ले केले जात आहेत. ही ना मर्दानी आहे. हे पाठीत खंजूर खूपसून राजकारण करण्यासारखे आहे. त्याविरोध हा उसळलेला आगडोंब आहे. मला वाटते ही सुरुवात आहे. एक ठिंगी पडलेली आहे. आणि या पुढे जस जसे त्यांची पावले पडतील, त्यानुसार आमची पावले पडतील, असा इशाराही त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महानरपालिकेची सत्ता मिळवण्याची भाषा करणारे खूप जण आले आणि गेलेही, अनिल परबांचा फडणवीसांना टोला 

News Desk

जखमी गोविंदांवर राज्यातील सर्व शासकीय, पालिका रुग्णालयांमध्ये मोफत उपचार; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Aprna

विवाह सोहळ्यातील जेवणातून शेकडो जणांना विषबाधा, सर्वांची प्रकृती स्थिर

News Desk