HW News Marathi
मनोरंजन

पंडित जवाहरलाल नेहरू यांचे निवडक सुविचार

जवाहरलाल नेहरू यांचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर इ.स. १८८९ रोजी झाला आहे. पंडित नेहरू हे मूळचे काश्मिरी पंडित होते.पंडित नेहरू यांच्या वडिलांचे नाव मोतीलाल नेहरूआणि आईचे नाव श्रीमती कमला नेहरू होते. जवाहरलाल नेहरू यांचे सुरुवातीचे शिक्षण घरीच खाजगी शिकवण्यांद्वारे झाले. वयाच्या १५ व्या वर्षी ते इंग्लंडला आणि त्यानंतर दोन वर्षे ते हॅरो येथे शिक्षणाकरिता गेले. कॅम्ब्रिज विद्यापीठातून त्यांनी सामान्य विज्ञान (नॅचरल सायन्स) या विषयात पदवी घेतली होती.२६ व्या वर्षी त्यांचा विवाह कमला कौल यांच्याशी झाला.जवाहरलाल मोतीलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान व भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. ते पंडित नेहरू व चाचा नेहरू या नावांनीही ओळखले जातात.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जाणून घ्या…का साजरा केला जातो जागतिक चहा दिवस

News Desk

शब्दांचे जादूगार गुलजार…

swarit

काळवीट शिकार प्रकरणी १७ जुलैला होणार पुढील सुनावणी

News Desk
महाराष्ट्र

भाजपाचा महामेळावा सुरु होण्याआधीच भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस

News Desk

मुंबई | भाजपच्या 38 व्या स्थापना दिनानिमित्त मुंबईच्या एमएमआरडीए ग्राऊंडवर आज भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यासाठी राज्यभरातून हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते दाखल झाले आहेत. या मेळाव्यात दिवंगत गोपीनाथ मुंडे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपला मुंडेंचा विसर पडल्याची टीका काही कार्यकर्त्यांनी केली आहे. भाजपच्या या कार्यक्रमातील एकाही पोस्टरवर गोपीनाथ मुंडे यांचा फोटो नाही. गोपीनाथ मुंडे यांचा विसर पडल्याने बीडचे मुंडे समर्थक चांगलेच आक्रमक झाले आहेत. ठिकठिकाणी झळकत असलेल्या पोस्टर्सवरून गोपीनाथ मुंडे यांचा फोटो गायब आहे.

त्यामुळे मुंडे समर्थकांनी सभास्थळी घोषणाबाजी सुरू केली. गोपीनाथ मुंडे यांचा फोटो पोस्टरवर लावण्याची मागणी या कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, भाजपच्या या मेळाव्यामुळे मुंबईतील वाहतूक ठप्प झाली असून चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे. काही ठिकाणी मुंबईकरांनी भाजप कार्यकर्त्यांच्या बसेस अडून धरल्याच्या घटना घडल्या आहेत.

Related posts

नैतिकतेच्या मुद्दय़ावर राजीनामा देण्याची जबाबदारी फक्त शिवसेना, राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर आहे?

News Desk

उदयनराजे भोसले यांनी ‘या’ कारणामुळे घेतली थेट शरद पवारांची भेट!

News Desk

ममता बॅनर्जी यांना आमच्या पक्षाचा पाठिंबा,ममताजींचे पत्र शरद पवार प्राप्त – नवाब मलिक

News Desk