HW News Marathi
राजकारण

मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याच्या संख्येत वाढ !

मुंबई | मुनगंटीवार वनमंत्री झाल्यापासून वाघ मारण्याची संख्या वाढली आहे, असा आरोप काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी केला आहे. राज्यात भाजपचे सत्तेत आल्यानंतर २०१५ मध्ये १४ वाघांचा मृत्यू झाला. २०१६ मध्ये १६ आणि २०१७ मध्ये तब्बल २१ वाघांचा मृत्यू असल्याचे निरुपम यांनी यावेळी म्हणाले आहे. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघीणच्या हत्यावरून भाजप सरकार विरोधात जोरदार हल्लाबोल केला आहे. निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन अवनी वाघिणी हत्येप्रकरणावरून मुनगंटीवार यांचा खरपूस समाचार केला आहे.

निरुपम पुढे असे देखील म्हटले की, अवनी वाघीण हत्या प्रकरणी मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळातून हटवून त्यांच्यावर कारवाई करायला हावी. तसेच याप्रकरणाची सीबीआय चौकशी व्हावी, अशी मागणी निरुपम यांनी यावेळी केली आहे. शिवाय, मुनगंटीवार हे आंतरराष्ट्रीय शिकारी माफियासोबत आहेत, त्याच्यासोबत ते पैसे कमवत आहेत, असा गंभीर आरोपदेखील निरुपम यांनी केला आहे. यात काही वाघांचा नैसर्गिक मृत्यूही झाला असावा. पण वाघांना ठार मारल्याच्या घटना पाहता सुधीर मुनगंटीवार हे शिकार करणाऱ्या आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीत सामील असावेत, असे वादग्रस्त विधान निरुपम यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजनाथ सिंग यांनी केला केजरीवाल यांना फोन

News Desk

…अन्यथा २६ जानेवारीपासून अन्नत्याग आंदोलन करू, लिंगायत समाजाचा इशारा

News Desk

“लवकरच मुंबई पालिकेसह विधानसभा निवडणुका घ्याव्यात” – उद्धव ठाकरे

Manasi Devkar
महाराष्ट्र

एसटी महामंडळाच्या तिकीटात १५ जूनपासून १८ टक्के वाढ

swarit

मुंबई | एसटीने प्रवास करणे सर्वांच आवडते. परंतु हा प्रवास येत्या १५ जूनपासून महाग होणार आहे. एसटीच्या तिकीटात १८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. सतत इंधनच्या दरात होणाऱ्या वाढीमुळे प्रवास भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून नुकतीच एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात देखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे एसटी महामंडळावर प्रचंड ताण येत असल्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचे रावते यांनी सांगितले.

इंधन दरवाढीमुळे एसटी महामंडळावर मोठा आर्थिक ताण येत होता. त्यामुळे एसटी महामंडळाने ३० टक्के भाडेवाढचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परंतु प्रवाशांवर ही आर्थिक ताण येऊ नये म्हणून १८ टक्के भाडेवाढ करण्याचा अंतिम निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली.

 

संबंधित बातम्या | मुंबईत पहाटेपासून पावसाला सुरुवात, 8 ते 10 जूनला अतिवृष्टीचा इशारा..

Related posts

आषाढीची महापूजा निर्विघ्न पार पडू द्यावी । उदयनराजे भोसले 

swarit

तुमचा राग तुमची मने जिवंत ठेवा !

News Desk

कँन्सर जनजागृती साठी मँरेथॉन दौड

News Desk