HW News Marathi
राजकारण

आम्ही ज्या दिशेने हवा असेल, त्या पक्षाला साथ देणार !

मुंबई | ‘आम्ही ज्या दिशेने हवा असेल, त्या पक्षाला साथ देणार’, असे थेट विधान केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले आहे. आठवले यांनी काँग्रेससोबत जाण्याबाबत बोलताना हे विधान केले आहे. दिवाळीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. याचाच अर्थ, ज्यावेळी जे सरकार सत्तेत असेल त्यावेळी रामदास आठवले त्या पक्षासोबत असतील असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

रामदास आठवले यांना नसीम खान यांनी त्यांच्या पक्षात (काँग्रेस) सामील होण्याबाबत विचारले होते. याविषयी बोलताना आठवले म्हणाले कि, जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत भाजपसोबत राहणार. मी अंदाज घेऊन मी निर्णय घेईन. मी १० ते १५ वर्षे काँग्रेससोबत होतो. येथेही (भाजप) मला ५ ते २० वर्षे राहावे लागणार आहे. त्याचप्रमाणे ज्या दिशेने हवा असेल, त्या पक्षाला साथ देणार असल्याचे रामदास आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

राजकीय सुडबुध्दीतून माझ्याविरुद्ध तक्रारी !

News Desk

#LokSabhaElections2019 : गोवा काँग्रेसकडून राज्यात सत्ता स्थापनेचा दावा

News Desk

एकाकी लढून शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही

News Desk
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये लष्कराबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमधील चकमक दरम्यान या दोघांचा खात्मा करण्यात केला. पुलवामा जिल्ह्यातील तिक्केन परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती जवानांनी मिळाली होती. यानंतर राष्ट्रीय रायफल्स, सीआरपीएफ आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपने घटनास्थळी पोहचल्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबारी सुरू झाली.

यात दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. लियाकत अहमद आणि वाजिद असे ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. या कारवाई दरम्यान परिसरातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली. तसेच काश्मीरमधील ६ नोव्हेंबरला शोपियानमध्येही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीतही दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले. मोहम्मद इदरीस सुलतान आणि आमिर हुसैन रैदर अशी ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची नावे होती. या दोघांचाही दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे.

 

 

 

Related posts

केरळ विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेले पायलट महाराष्ट्राचे सुपुत्र होते

News Desk

महिलांविषयीच्या वक्तव्यामुळे पन्नालाल चांगलेच अडचणीत

News Desk

भारताने सीमारेषा पार करू नये, चीनचा भारताला उपदेश

News Desk