HW News Marathi
महाराष्ट्र

चंद्रपूरमध्ये नाकाबंदी दरम्यान पोलिसांना शस्त्र बाळगण्याचे निर्देश

चंद्रपूर | चंद्रपूरचे पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी काल (बुधवार) पोलीस यंत्रणेला त्यांच्या सुरक्षेसंदर्भात काही निर्देश दिले आहेत. “चंद्रपूर जिल्हा शांत असल्याने पोलीस नाकाबंदीच्या वेळी शस्त्र बाळगत नव्हते. परंतु आता चंद्रपुरात नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी शस्त्र बाळगावे. त्याचप्रमाणे जर कुणी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला तर स्वतःच्या रक्षणासाठी ते त्या शस्त्राचा वापर करू शकतात”, असे निर्देश रेड्डी यांनी दिले आहेत. पोलीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी हे पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे यांच्या अंत्यसंस्कारावेळी उपस्थित होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या निर्देशांची माहिती दिली आहे.

पोलीस निरीक्षक छत्रपती किसनराव चिडे हे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा (स्कॉर्पिओ) पाठलाग करत असताना त्याच वाहनाने त्यांना चिरडल्याची अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मंगळवारी (६ नोव्हेंबरला) सकाळी ही घटना घडली आहे. छत्रपती किसनराव चिडे यांची एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून ओळख होती.दारूची वाहतूक करणारे वाहन रस्त्यावर थांबलेले असताना गाडीतून पाठलाग करणारे पोलिस गाडीतून खाली उतरून त्या गाडीच्या दिशेने चालू लागले. तितक्यातच दारूची वाहतूक करणाऱ्या गाडीने रिव्हर्स घेवून पोलिसांच्या अंगावर घातली. दुर्दैवाने छत्रपती चिडे या गाडीखाली चिरडले गेले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरूवात ,मास्क घालून मंत्र्यांचे कामकाज सुरू…

News Desk

तासगावचा रथोत्सव होणार उत्साहात साजरा

News Desk

कांदा निर्याती संदर्भात निर्णय होईपर्यंत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा !

swarit
देश / विदेश

चिमुकलीच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेऊन पेटवला

swarit

मेरठ। मिलक गावामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. तीन वर्षांची मुलगी फटाक्यांमुळे गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका मुलाने चिमुकलीच्या तोंडामध्ये सुतळी बॉम्ब ठेवला आणि तो पेटवला. तो बॉम्ब तोंडात फुटल्याने मुलगी गंभीर जखमी झाली आहे. यानंतर तिला तातडीने रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले, मात्र तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पोलिस आरोपीचा शोध घेत असून पिडीत मुलीचे वडील शशी कुमार यांनी तक्रार केली असे सांगण्यात येत आहे आहे. पीडित मुलगी घराबाहेर खेळत असताना हरपालने तिच्या तोंडात सुतळी बॉम्ब ठेवला आणि पेटवला. मुलीला तब्बल ५० टाके पडले आणि घशालाही इजा झाली आहे.

Related posts

मैत्रिणीसोबत सेक्स करतानाचा व्हिडीओ फेसबूकवर केला व्हायरल

News Desk

बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्यासाठी अमोल कोल्हेंची केंद्राकडे धाव

News Desk

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGIची मंजुरी

News Desk