HW News Marathi
राजकारण

दिवाळीनंतर मराठा क्रांती मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक

मुंबई | मराठा आरक्षणासाठी दिवाळीनंतर सकल मराठा क्रांती मोर्चाने आक्रमक होण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील आंदोलन राज्यव्यापी असल्याची माहिती मंगळवारी सकल मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली आहे. सकपाळ यांनी २ नोव्हेंबरपासून आझाद मैदाात क्रांती मोर्चाे बेमुदत उपोषण सुरू आहे. मराठा आरक्षणासाठी युवकांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांच्या घरात सरकारविरोधात काळी दिवाळी साजरी होत आहे.

“मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंतची मुदत मागितल्याने, तोपर्यंत बेमुदत उपोषणाद्वारे इतर मागण्यांचा पाठपुरावा सुरू आहे. गेल्या तीन दिवसांत पाच आंदोलकांना प्रकृती खालावल्याने रुग्णालयात भरती करावे लागले. मात्र, भावना शून्य सरकार मराठा समाजाच्या सहनशीलतेचा अंत पाहात आहे. याचे परिणाम सरकारला दिवाळीनंतर भोगावे लागतील,” असा इशाराही सकपाळ यांनी दिला आहे.

तसेच समन्वयक प्राध्यापक संभाजी पाटील म्हणाले की, सरकारने मराठा समाजातील काही समन्वयकांना हाताशी घेऊन आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यामुळे १५ नोव्हेंबरनंतर विविध ठिकाणी आंदोलनांची घोषणा केली जात आहे. मुंबईमध्ये निर्णायक आंदोलन होऊ नये, म्हणून मराठा समाजाची दिशाभूल करण्याचे हे षडयंत्र आहे. मात्र, आरक्षण आणि इतर मागण्यांची पूर्तता होत नसल्याने, आर्थिक व सामाजिक अडचणीत सापडलेला ग्रामीण भागातील मराठा समाज दिवाळीनंतर मुंबईत एकवटेल. गुराढोरांसह आणि शेती साहित्य घेऊनच १५ नोव्हेंबरनंतर मराठा शेतकरी आणि शेतमजूर मुंबईवर धडक देईल, असे सकल मराठा क्रांती मोर्चाने स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधान परिषदेत ‘मविआ’च्या पदरी निराशा; मलिक, देशमुख मतदानापासून वंचित

Aprna

मध्य प्रदेश-मिझोरममध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू

News Desk

ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी छिंदमवर गुन्हा दाखल

News Desk