HW News Marathi
राजकारण

दुष्काळ उपाययोजनांसाठी केंद्राकडे ७ हजार कोटीची मागणी

उस्मानाबाद | ‘राज्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही आज ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करणारा प्रस्ताव पाठविला’, असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी(६ नोव्हेंबर)ला उस्मानाबादमध्ये सांगितले. जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्री आज (६नोव्हेंबर)ला उस्मानाबाद जिल्ह्यात आढावा बैठक बोलवली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, राज्य सरकार दुष्काळावर उपाययोजनां करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले आहे. पुढे ते असे देखील म्हटले की, याआधी कोणीच दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली नाही.

आमच्या सरकारने ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. तसेच कृष्णा- मराठवाडा प्रकल्पासाठी नाबार्डकडे २२०० कोटींची मागणी केली असल्याचे देखील मुख्यमंत्र्यांनी सांगितले. केंद्राकडे मदतीचा प्रस्ताव पाठविला असून तो डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल आणि जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल, अशी आशा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरेंच्या वैचारिक विचारसरणीचे! – प्रकाश आंबेडकर

Aprna

धक्कादायक… उस्मानाबादमध्ये मतदान करताना राष्ट्रवादीचे फेसबुक लाईव्ह

News Desk

महाराष्ट्रात जागावाटपावरून महाआघाडीला सुरूंग

News Desk