HW News Marathi
राजकारण

राम मंदिरासाठी हिंदू संतांचा सरकारवर दबाव

नवी दिल्ली । आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी सरकारने ठोस पावले उचलावीत असा दबाव वारंवार सरकारवर होत आहे. बाबरी मशिद-राम मंदिराच्या वादावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालायने लांबणीवर टाकली आहे. ‘आता संयम संपत चालला आहे, गरज पडली तर राम मंदिरासाठी पुन्हा १९९२ प्रमाणे आंदोलन सुरु करावे लागेल’ असे विधान राष्ट्रीय स्वयंम संघाने केले आहे. त्यांनतर आता हिंदू संतांनी सुद्धा सरकारवर दबाव वाढवण्यास सुरुवात केली आहे.

तालकटोरा स्टेडियममध्ये गेले दोन दिवस अखिल भारतीय संत समितीचे अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनाला देशभरातून आलेल्या तीन हजारांहून अधिक संतांनी उपस्थिती दर्शवली होती. अयोध्येतील राम मंदिराखेरीज गोरक्षा व गंगा शुद्धिकरणाची एकमुखाने मागणी केली आहे. येत्या ६ डिसेंबरपूर्वी केंद्र सरकारनेयासाठी निर्णायक पाऊल उचलावे, अशी मागणी तिथे कऱण्यात आली आहे.अधिवेशनाचा समारोप करताना समितीचे निमंत्रक रामानंद हंसदेवाचार्य यांनी केंद्र सरकारला आदेश दिला,

“केंद्र सरकारने राम मंदिरासाठी येत्या अधिवेशनात कायदा करावा किंवा वटहुकूम काढावा”. “सध्याच्या केंद्र सरकारचे काम समाधानकारक असले,तरी आगामी निवडणुकीत ‘गाय’ ‘गंगा’ व ‘गोविंद’ यांचे रक्षण करणाऱ्यांनाच जनतेने निवडून द्यावे”, असे आवाहन ही संतांनी केले आहे.अधिवेशनात भाषण करताना जगद्गुरू रामभद्राचार्य म्हणाले की, आपलीच माणसे सत्तेवर बसवूनही ते इतरांसारखे वागतात हे पाहून धक्का बसला. अयोध्येत राम मंदिर उभे राहायलाच हवे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजपच्या ‘या’ नेत्याने चक्क केला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश !

News Desk

काँग्रेसला बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही !

News Desk

मुख्यमंत्र्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावे !

News Desk
राजकारण

गेल्या चार साडेचार वर्षात त्याच्यावर खूप अत्याचार झालेत !

Gauri Tilekar

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रातून आपल्या शैलीत मोदी सरकारवर खोचक टीका केली आहे. राज ठाकरे यांनी गेल्या साडे चार वर्षात मोदी सरकारमुळे देशाची स्थिती काय झाली आहे यावर भाष्य करणारे एक व्यंगचित्र आपल्या फेसबुकवर पोस्ट केले आहे.

धनत्रयोदशीला लोक जशी धनधान्याची पूजा करतात त्याचप्रमाणे हा दिवस वैद्यकीय शास्त्राचा देव ‘धन्वंतरी’ ह्याचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. देवांचा वैद्य म्हणून या धन्वंतरीला ओळखले जाते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या मुहूर्त साधून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी या व्यंगचित्रात भारताला आयसीयूमध्ये दाखविले आहे. यात ‘काळजीचे कारण नाही मात्र देशाची ही परिस्थिती गेल्या साडे चार वर्षात झाली असून त्याच्यावर खूप अत्याचार झाले आहेत. लोकसभा निवडणुकांनंतर देश शुद्धीवर येईल.’, असे देव धन्वंतरी काळजीत पडलेल्या लोकांना सांगत आहेत.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिकेत तटकरेंना उमेदवारी

News Desk

मसूद प्रकरणी मोदींनी पाकिस्तानचे दात घशात घातले, कमाल झाली !

News Desk

“टाटा एअर बस प्रकल्प राज्याबाहेर जाणे ‘मविआ’चा फेक नरेटिव्ह”, फडणवीसांचा आरोप

Aprna