HW News Marathi
राजकारण

एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही !

औरंगाबाद मराठा आरक्षणासंदर्भात १५ नोव्हेंबरपूर्वी सत्ताधारी पक्षांसह विरोधातील सर्व पक्षांनी भूमिका जाहीर केली नाही तर, २५ नोव्हेंबरनंतर एकाही आमदार, खासदाराला राज्यात फिरू देणार नाही, असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे देण्यात आला आहे. औरंगाबाद येथील न्यू हनुमाननगर चौकात शुक्रवारी (२ नोव्हेंबर) कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी तिसर्‍या पर्वाचे रणशिंग फुंकण्यात आले.

“मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून दोन वर्षांपासून मराठा आरक्षणाची मागणी लावून धरण्यात आली आहे. मात्र समाजाला झुलवत ठेवत सरकारने अजून पर्यंत सकारात्मक निर्णय घेतलेला नाही,राज्यकर्त्यांनी १५ नोव्हेंबरपर्यंत निर्णय घेण्याचा दिलेला शब्द पाळावा, असे आवाहन मराठा मोर्चाचे समन्वयक रमेश केरे यांनी केले आहे .”अन्यथा २५ नोव्हेंबरनंतर राज्यातील २८८ आमदार व ४८ खासदारांना फिरू देणार नाही,” असा इशारा केरेनीं दिला आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आपण गप्प बसणारच नाही; मराठा मरणारा नाही, तर लढणारा आहे. त्यामुळे युवकांनी आत्महत्या करू नये, असे आवाहन पूजा मोरे यांनी केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

इतक्या वर्षांनंतर मोदी यांच्या तोंडून राममंदिराचा उच्चार तरी झाला!

News Desk

शेगावत होणाऱ्या सभेत सोनिया गांधी उपस्थित राहणार; उद्धव ठाकरे हजेरी लावणार?

Aprna

अभिषेक बॅनर्जी यांनी पंतप्रधान मोदींना पाठविली अब्रुनुकसानीची नोटीस

News Desk
मुंबई

उच्च न्यायालयाची राजकीय पक्षांना नोटीस

Gauri Tilekar

मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्स लावल्याप्रकरणी भाजप, मनसे,रिपब्लिकन पक्ष, आणि राष्ट्रवादी काँग्रस या सर्व राजकीय पक्षांना काल (शुक्रवार) नोटीस बजावली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘या सर्व राजकीय पक्षांना त्यांनी अनधिकृत होर्डिंग्स बॅनर्स का लावले ?’ याचे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाला द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर राजकीय पक्ष स्वत: कोणती कारवाई करणार ? याची माहिती देखील उच्च न्यायालयाने देण्यास सांगितली आहे.

मागील सुनावणीत याचिकाकर्त्यांनी सादर केलेल्या अहवालानुसार, महापालिकांच्या हद्दीत शिवसेना व भाजपकडून सर्वाधिक अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या पाठोपाठ काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे यांचा देखील अनधिकृत होर्डिंग्स लावण्यात समावेश होतो.

मुंबई उच्च न्यायालयाने जानेवारी २०१७ मध्ये दिलेल्या आदेशानुसार जून, २०१७ मध्ये राजकीय पक्षांनी अनधिकृत होर्डिंग्स, बॅनर्स लावणार नाही आणि कार्यकर्त्यांनाही तशी सूचना देऊ, अशी या सर्व राजकीय पक्षांनी न्यायालयाला दिली होती. तरीही यावेळी सणांच्या काळात पुन्हा या सर्व राजकीय पक्षांनी म्हणजेच त्यांच्या कार्यकर्त्यांना अनधिकृत होर्डिंग्स आणि बॅनर्स लावल्याचे याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.

Related posts

भांडुप उड्डाणपुलावर कार आणि कंटेनरची धडक 

swarit

इंदिरा गांधीवरील ठरावावरून दोन्ही कॉँग्रेस आमने-समाने

News Desk

पालघर जिल्ह्यातील डहाणूत भूकंपाचे जोरदार धक्के

News Desk