HW News Marathi
महाराष्ट्र

जायकवाडी धरणात पाणी सोडण्याचे आदेश

औरंगाबाद | समन्यायी पाणीवाटपानुसार जायकवाडी धरणात वरच्या धरणांतून ताबडतोप पाणी सोडण्याचे हायकोर्टाच्या आदेशनंतर गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक अजय कोहिरकर यांनी याबाबत आदेश काढले आहेत. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची सोमवारी (२३ ऑक्टोबर) झालेल्या बैठकीत आदेश देण्यात आला आहे.

या आदेशानुसार जायकवाडी धरणात ऊर्ध्व खोऱ्यातील जलाशयांतून जवळपास ९ टीएमसी पाणी येणार आहे. आदेशाची अंमलबजावणी केव्हा होणार यावर अद्याप माहिती उपलब्ध झाली. मात्र वरच्या धरणातून ९ टीएमसी पाणी सोडल्यानंतर प्रत्यक्षात जवळपास ६ टीएमसी पाणी जायकवाडीत येऊ शकते.

राज्यातील जलसंपत्तीचे विनियमन करण्याकरिता जलसंपत्तीचे कुशल, समन्यायी आणि टिकाऊ व्यवस्थापन वाटप आणि वापर करण्याकरिता महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम २००५ पारित करण्यात आला. राज्यातील भू-पृष्ठावरील, भूगर्भातील पाणी वापराचे नियमन करणे, जलसंपत्तीचे कायदेशीर, समन्यायी आणि शाश्वत व्यवस्थान वाटप करणे, पाणी वापरासाठी दर निश्चित करणे आणि पाणी वापराचे हक्क प्रदान करणे यासाठी हा कायदा आहे.

धरणात ऐवढे पाणी सोडले जाणार

जायकवाडी धरणामध्ये मुळामधून ५४ दलघमी १.९० टीएमसी, प्रवरामधून १०९ दलघमी ३.८५ टीएमसी, गंगापूर धरणातून १७ दलघमी ०.६० टीएमसी, दारणा धरणातून ५७.५० दलघमी २.०४ टीएमसी, पालखेड समुहातून १७० दलघमी ६० टीएमसी असं एकूण २५४ दलघमी (८.९९ टीएमसी) अशा विविध धरणांमून पाणी सोडण्याचे आदेश देण्यात येणार आले आहेत.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘मुंबईकरांच्या पाठीत खंजीर खुपसला’; मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पावर भाजपाची टीका

News Desk

संजय राऊतांचे लक्ष उद्धव ठाकरेंच्या पदाच्या खुर्चीवर; राणेंचा सूचक इशारा

Aprna

विनायक पाटील यांच्या निधनामुळे बहुआयामी नेतृत्व हरपले | बाळासाहेब थोरात

News Desk
महाराष्ट्र

गोदावरी पाणी प्रश्नाबाबत आमदारांचा बेफिकीरपणा

Gauri Tilekar

औरंगाबाद | पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात असल्याने मराठवाड्यातील पाणीप्रश्नाच्या चर्चेसाठी भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत अपेक्षेनुसार कमी आमदारांची हजेरी लागली होती. बैठकीसाठी विधानसभा आणि विधान परिषदेतील ५६ आमदारांना निमंत्रण पाठवण्यात आले होते. त्यातले फक्त १८ आमदार उपस्थित होते . त्यातले अवघे पाचच बैठकीतल्या चर्चेत शेवटपर्यंत हजर होते. केवळ आमदारांनीच नाही तर खाजदारांची हजेरीही निराशा जनक होती.

आठ खाजदारांपैकी एकही खाजदारानी पाणीप्रश्न चर्चेच्या बैठकीत उपस्थित नसल्याने मराठवाड्यातील लोकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे.या बैठकीत हक्काचे पाणी सोडण्याची मागणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना करावी असा निर्णय घेण्यात आला.मार्चला बजेटमध्ये मराठवाड्याच्या विकासासाठी विशेष सवलती मिळावी म्हणून मराठवाड्यातील सर्व आमदारांनी एकजूट दाखवून योजना मंजूर करून घेण्याच्या मुद्द्यावरही उपस्थितांचे एकमत झाले आहे.

वरच्या भागात धरणे बांधल्यामुळे मराठवाड्यात कमी पाणी येते. यामुळे आत्महत्येत वाढ होत आहे.तसेच शरद पवार, राधाकृष्ण विखे पाटील यांनी आदेश दिले तर अतिरिक्त पाणी मिळण्यास मदत होईल.असे बैठकीच्या दरम्यान प्रशांत बंब यांनी वक्तव्य केले .

Related posts

खडसे यांच्या आदेशानेच मी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला- उदयसिंग पाडवी

News Desk

लखीमपूर खेरीप्रकरणातील आरोपी आशिष मिश्रा यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द

Aprna

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

News Desk