HW News Marathi
महाराष्ट्र

पूर परिस्थिती असताना, तुम्ही निवडणुकांचा विचार तरी कसा करून शकता !

मुंबई | “कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे पूरपरिस्थितीवर राजकारण न आणता पूरग्रस्त जनतेच्या पाठिशी उभे राहण्याची गरज असल्याचे सांगत,” पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीका केली आहे. “महाराष्ट्रातील पूर परिस्थितीला राष्ट्रीय आपत्ती घोषित करावी की, करू नये. या शब्दात अडकण्यापेक्षा सध्याच्या पूर परिस्थितीवर कशी मात करता येईल, याचा विचार करण्याची गरज असल्याचे मत ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना मांडले.”

राज्यातील पूरपरिस्थिती पाहता निवडणुका पुढे ढकल्याची मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली होती. परंतु, यावर प्रश्न विचार ते उद्धव ठाकरे म्हणाले की, “राज्यात पूर परिस्थिती असताना तुम्ही निवडणुकीचा विचार तरी कसा करून शकता असे म्हणत, राज ठाकरेंना टोला लगावला.

“आलमट्टी धरणातील पाण्याबद्दल बोलताना, ठाकरे म्हणाले की, “जे सत्य असेल ते उघड होईल, कर्नाटक सरकार काही पाप करत असेल तर तेही उघडकीस येईल, असे म्हणाले. दरम्यान, पाहणीसाठी का गेला नाहीत ? या प्रश्नावरही उद्धव यांनी उत्तर दिले की, “तिथ जाऊन कोरडी सहानुभूती दाखविण्याच काम मी करणार नाही. आम्ही येथून राहून जे शक्य ते आणि शिवेसना काय करायचेय ते मदतकार्य करत आहे,” असेही उद्धव ठाकरेंनी म्हणाले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना भवन येथून कोल्हापूर व सांगली मधील पूरग्रस्तांसाठी शिवसेनेच्या वतीने “शिवसहाय्य” जीवनावश्यक आणि वैद्यकीय मदत रवाना करण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या परिस्थिती पत्रिकार परिषदेत ते बोलत होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन वाझे अटक प्रकरणात शरद पवार आणि अनिल देशमुख काय म्हणाले ?

News Desk

उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर ‘या’ कारणामुळे नाराज?

News Desk

नरेंद्र मोदी यांच्या रुपाने आपल्या देशाला तोतया पंतप्रधान लाभला | कुमार केतकर

News Desk