HW News Marathi
मुंबई

रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई । मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या तिन्ही मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर तर हार्बरवरील पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर रविवारी मेगाब्लॉक असणार आहे. तसेच पश्चिम रेल्वेवरील बोरीवली-अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक असणार आहे.

ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान रविवारी सकाळी १० वाजून ३० मिनिटे ते दुपारी ३ वाजून ३० मिनिटांपर्यंत डाऊन जलद मार्गावर देखभाल-दुरुस्तीची कामे करण्यात येतील. यामुळे ठाणे-कल्याणमधील वाहतूक डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येणार असल्याने लोकल फेऱ्या सुमारे २० मिनिटे विलंबाने धावणार आहेत.

मेगाब्लॉक काळात प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सूटणा-या जलद व अर्धजलद लोकल फे-यांना नियमित थांब्यासह अतिरिक्त थांबा देण्यात येणार आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.

पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते दुपारी २ वाजून ३५ मिनिटांपर्यंत बोरीवली ते अंधेरी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी, ब्लॉक काळातील वाहतूक अप आणि डाऊन धिम्या मार्गावर वळविण्यात येईल.

हार्बर मार्गावर रविवारी सकाळी ११ वाजून ३० मिनिटे ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक असेल. ब्लॉक काळात या मार्गावरून एकही लोकल धावणार नाही. प्रवाशांसाठी सीएसएमटी-वाशी आणि ठाणे-वाशी-नेरूळ मार्गावर विशेष फे-या चालविण्यात येणार असल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

फेरीवाल्यांनी मनसे पदाधिका-यालाच झोडपले

News Desk

#metrofordombivli : आता डोंबिवलीकरांची मेट्रोची मागणी

News Desk

मराठा समाजाने आशिष शेलार यांना हुसकावले

News Desk
देश / विदेश

#Amritsar : रावणाची भूमिका साकारणाऱ्याचाही दुर्दैवी मृत्यू

Gauri Tilekar

अमृतसर | पंजाबमधील अमृतसरमध्ये चौडा बाजार येथे रावणदहन पाहण्यासाठी गेलेल्या लोकांना दोन भरधाव वेगाने ट्रेन्सनी धडक दिल्याची अत्यंत दुर्दैवी घटना काल (शुक्रवारी) रात्री घडली. रामलीलेमध्ये रावणाची भूमिका साकारणाऱ्या दलबीर सिंहचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी अनेकजण रेल्वे रुळांवर उभे होते. याच अनेकांपैकी एक दलबीरही होता. या दुर्दैवी अपघातात ६१ हूनही अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७२ जण जखमी झाले आहेत.

दलबीरच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. दलबीर सिंह हा अनेक वर्षांपासून रामलीलेत रावणाची भूमिका साकारत होता अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली आहे. रावणदहनाच्याच दिवशी दलबीरचा मृत्यू ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. या अपघाताला स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप दलबीरच्या नातेवाईकांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान मोदींनी काल (शुक्रवारी) रात्री या दुर्दैवी अपघाताबाबत दुःख व्यक्त केले आहे. ‘अमृतसरमधील रेल्वे दुर्घटनेमुळे अत्यंत दुःख झाले आहे. आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबियांच्या दुःखात मी सहभागी आहे. या अपघातातातील जखमींनी लवकरात लवकर बरे व्हावे अशी मी प्रार्थना करतो. यासाठी आवश्यक ते सहाय्य त्वरित देण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत,’ असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

Related posts

सगल तीन दिवस बँका रहाणार बंद

News Desk

२४ तास ऑक्सिजन निर्मिती, वाहतूक करा, पंतप्रधानांचे आदेश

News Desk

Air India : आंतरराज्यीय आणि आंतरराष्ट्रीय विमानांचे ऑनलाईन बुकिंग सुरु

News Desk