HW News Marathi
मुंबई

शिवाजी पार्कमध्ये अवतरणार साईंची शिर्डी

मुंबई | मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये दोन दिवसीय ‘श्री साई महासमाधी शताब्दी संमेलनाचे आयोजन येत्या 14 आणि 15 ऑक्टोबर ला करण्यात आले आहे. दक्षिण- मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या संमेलनाला मुंबईतून सुमारे दीड लाख साई भक्त उपस्थित राहण्याची शक्यता आयोजकांनी वर्तविली आहे.

सद्गुरू श्री साईबाबांनी शिर्डी येथे ज्या दिवशी देह ठेवला, त्या दिवसाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने ‘श्री साई भक्त मंडळा’च्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात श्री साईसच्चरीत ग्रंथ, श्री स्वामी समर्थ चरित्र ग्रंथ आणि श्री गजानन महाराज विजय ग्रंथ यांचे अखंड पारायण होणार आहे. भजन- कीर्तन यांच्या गजराने शिवाजी पार्कचा परिसर भक्तिमय होणार असून मुंबईतील साई मंडळे आणि साई मंदिरांचेही एक छोटेखानी संमेलन यावेळी होणार आहे. मुंबईत पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर आयोजित करण्यात येणाऱ्या या महासमाधी शताब्दी सोहळ्याला सर्व साई भक्तांनी आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुरजी पटेल यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाचा आक्षेप

Seema Adhe

शिवाजी पार्कच्या गणपतीला हापूस आंब्यांची आरास

News Desk

‘सामना’चा वापर फक्त वडापावाचे तेल काढण्यासाठी बॅनरमधून राष्ट्रवादीचा हल्ला बोल

News Desk
देश / विदेश

गुगलकडून अनोखी मानवंदना, पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आनंदीबाई जोशींचं डुडल

News Desk

मुंबई : गुगलने आज डॉ. आनंदीबाई जोशी यांचं त्यांच्या १५३ व्या जन्मदिनी डुडल बनवून त्यांना मानवंदना दिली आहे. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी कल्याणमध्ये झाला.

लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला. 14व्या वर्षी आई झालेल्या आनंदीबाई यांचा मुलगा दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवळ १० दिवसच जगू शकला. या घटनेनं त्यांना बराच धक्का बसला. त्यामुळे आपण डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. गोपाळराव यांनीही त्यांच्या या इच्छेला विरोध न करता त्यांना डॉक्टरकीच्या शिक्षणासाठी परदेशी पाठवण्याचा निर्णय घेतला

१८८३ म्हणजे वयाच्या 19व्या वर्षी ‘विमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्व्हानिया’मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूर्ण करुन मार्च इ.स. १८८६ मध्ये आनंदीबाईंनी एम.डी.ची पदवी मिळवली. ज्या काळात महिलांनी बाहेर पडणंही दुरापास्त होतं त्यावेळी आनंदीबाईंनी थेट डॉक्टर होण्यापर्यंतची मजल मारली.

आनंदीबाई या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी डॉक्टरकीची पदवी मिळवली. डॉ. आनंदीबाई यांचा जन्म कल्याणमधील एका पारंपारिक कुटुंबात झाला होता. वयाच्या 10व्याच वर्षी त्यांचा कल्याणमधील गोपाळराव जोशी यांच्याशी विवाह झाला होता.

पण डॉक्टर बनण्याचा त्यांचा हा निर्णय फार सोपा नव्हता. त्यावेळी त्यांच्या या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. पण या सगळ्यावर मात करत त्यांनी वयाच्या 19व्या वर्षी डॉक्टरकीची पदवीही मिळवली.

परदेशातून परतल्यानंतर काही काळ त्यांनी कोल्हापूरमधील एडवर्ड रुग्णालयात कामही केलं. दरम्यान, त्यावेळी तिथेच त्यांना क्षयाची बाधा झाली. आनंदीबाई या शिक्षणासाठी परदेशी गेल्या होत्या. त्यामुळे त्यांनी समुद्र उल्लंघन केलं आहे. असं म्हणत सर्व वैद्यांनी त्यांच्यावर उपचार करण्यास नकार दिला होता. त्यामुळे उपचाराअभावी 1887 साली म्हणजेच वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी आनंदीबाई यांचा मृत्यू झाला होता.

Related posts

आसाराम बापूचा आज निकाल, जोधपूरलमध्ये कडेकोट पोलीस बंदोबस्त

News Desk

सरकारने आंदोलनाच्या बस आणि रेल्वे गाड्या रोखल्या | अण्णा हजारे

News Desk

जाणून घ्या… वांद्रेतील घटनेवर राज्यातील नेते मंडळींच्या ‘या’ प्रतिक्रिया

News Desk