HW News Marathi
देश / विदेश

…फक्त 10 वर्षांसाठी आरक्षण हवं होतं !

नवी दिल्ली | आरक्षणावर बोलताना लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी टिपण्णी केली आहे. शिक्षण आणि नोकरीत कायमचे आरक्षण मिळणे हे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. रांचीमध्ये सुरू असलेल्या चार दिवसीय लोकमंथन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही सांगितले होते, की आरक्षण फक्त १० वर्षांकरिता आवश्यक आहे. आरक्षणाने देशाचे कल्याण होणार आहे काय ?, असा सवालही सुमित्रा महाजन यांनी उपस्थित केला आहे. तसेच देशाला पुढे नेण्यासाठी आंबेडकरांनी दिलेल्या मार्गाने चालणे गरजेचे आहे.

जोपर्यंत तुमच्यात देशाबद्दलची भक्ती वाढणार नाही, तोपर्यंत देशाचा विकास शक्य नाही. असेही त्या यावेळी बोलताना म्हणाले. संसद आरक्षण वाढवत चालले आहे. प्रत्येक वेळी १० वर्षांसाठी आरक्षण वाढवले जात आहे. एकदा तर आरक्षणाची मुदत २० वर्षांसाठी वाढविण्यात आली होती, असे कधीपर्यंत चालणार आहे. या आरक्षणाची मुदत वाढविण्यामागे काय विचार आहे. आमच्यासाठी सर्व धर्म समान आहेत. आज देशाला आणि समाजाला तोडणारी ताकद सक्रिय आहे. आदिवासींचे धर्म परिवर्तन केले गेले. परंतु आमच्या सरकारने धर्म परिवर्तनविरोधी कायदा केला. तसेच आरक्षणासंदर्भात सर्व पक्षांनी एकत्र येऊन विचारविनिमय करण्याची गरज आहे. त्यासाठी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल असेही त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

कृषी कायद्यांना दीड वर्ष स्थगिती देण्याचा केंद्राचा प्रस्ताव

News Desk

भाजपकडून पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे राजकारण केले जात आहे !

News Desk

त्रिपुरातील घटनेचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद; मालेगावत रॅलीला हिंसक वळण

News Desk