HW News Marathi
देश / विदेश

एसबीआयच्या एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत मोठी कपात

मुंबई | स्टेट बँक ऑफ इंडियाने एटीएममधून पैसे काढण्याच्या रकमेत मोठी कपात केली आहे. एसबीआयने दर दिवशीच्या पैसे काढण्याच्या मर्यादेत ही कपात केली असून ३१ ऑक्टोबरपासून सीबीआयच्या एटीएममधून दिवसाला केवळ २०,००० रुपये एवढीच रक्कम काढता येणार आहे. सध्या सीबीआयच्या ग्राहकांना एटीएममधून ४०,००० रुपयेच काढता येतात. मात्र लवकरच या रकमेत निम्म्याने कपात होणार आहे. सीबीआयने आपल्या सर्व शाखांना असे आदेश पाठविले आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे.या आदेशानुसार, एटीएम व्यवहारांमध्ये होणाऱ्या फसवणुकीमुळे तसेच डिजिटल-कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढवण्यासाठी एटीएममधून रोख रक्कम काढण्याची मर्यादा कमी करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. एसबीआयने केलेली ही एटीएममधून रोख रक्कम काढण्याची कपात गैरसोयीची ठरू नये यासाठी ज्या ग्राहकांना दिवसाला २०,००० पेक्षा अधिक रक्कम एटीएममधून काढावी लागते त्यांनी वरच्या श्रेणीतील कार्ड मागणी बँकेकडून करावी, असे गुप्ता यांनी सांगितले.

बँकेच्या Classic आणि Maestro या डेबिट कार्ड ग्राहकांना हा नियम लागू केला आहे.तसेच एसबीआयने हा निर्णय नेमका दिवाळीपूर्वीच लागू होणार असल्याने सर्वसामान्य ग्राहकांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मोदी सरकारकडून कॅशलेस व्यवहारांसाठी कायमच आग्रह धरला जात आहे. त्याचप्रमाणे काहींच्या मते नोटाबंदीच्या निर्णयानंतर आधीपेक्षा जास्त प्रमाणात नोटा बाजारात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वे राज्यमंत्रीपदाची सूत्र स्विकारताच रावसाहेब दानवे लोकल प्रवासाबद्दल म्हणाले…

News Desk

कोपर्डी प्रकरणातील आरोपीची याचिका फेटाळली

News Desk

“हिंदूस्थान म्हणजे निर्लज्ज लोकांचा देश”-संभाजी भिडे

News Desk