HW News Marathi
महाराष्ट्र

कुर्ल्यातील पालिकेच्या शाळेला वाळवी, नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी व्यक्त केली चिंता

मुंबई | महापालिकेच्या कुर्ला येथील शाळांना वाळवी लागल्याची बाब शिक्षण समितीच्या बैठकीत सदस्यांनी निदर्शनास आणली. मात्र ही समस्या एका शाळेपुरती मर्यादीत नसून बहुतांशी शाळांमध्ये भिंतींना आणि लाकडी बेंचना वाळवी लागल्याची तक्रारी सदस्यांनी केली. त्यामुळे शाळांमध्ये लागलेल्या वाळवीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी संस्थेची निवड करण्यात यावी, असे आदेश शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी प्रशासनाला दिले.

कुर्ल्यातील पालिकेची एच. पी. किर्लोस्कर शाळेत २०१३ पासून मोठ्या प्रमाणात वाळवी लागली आहे. ही वाळवी फक्त भिंतींना लागली नसून शाळेतील कपटांमध्ये ठेवण्यात आलेल्या पुस्तकांना देखील लागली आहे. शिक्षण समिती सदस्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका डॉ. सईदा खान यांनी गुरुवारी शिक्षण समितीच्या बैठकीत पालिका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले.

शिक्षण समितीच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका, शिक्षण समिती सदस्या डॉ. सईदा खान यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे शाळेतील वर्गांमध्ये लागलेल्या वाळवीबाबत चिंता व्यक्त केली. मागील अनेक वर्षांपासून कुर्ला येथील शाळेतील वाळवीबाबत आपण पाठपुरावा करत आलो आहोत. पण यापूर्वी पेस्ट कंट्रोल करण्यासाठी धोरण नव्हतं. परंतु माझ्या विभागातील किर्लोस्कर मार्ग महापालिका शाळेची दुरुस्ती केल्यानंतरही त्याठिकाणी भिंतींना वाळवी लागलेली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवाळीचा आनंदाचा शिधाचे वितरण आजपासून ऑफलाईन पध्दतीने होणार! – रविंद्र चव्हाण

Aprna

निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर

swarit

राज्यात कॉपीमुक्त अभियानाची अंमलबजावणी करणार

Aprna
मनोरंजन

#HappyBirthdayLataDi | लतादीदींच्या ‘या’ गाण्याने नेहरुंच्या डोळ्यात अश्रु दाटले

News Desk

अपर्णा गोतपागर | गानकोकिळा लता मंगेशकर यांच्यासारखा आवाज असावा असे देशातील प्रत्येक व्यक्तीला वाटते. दीदींच्या आवाजाचा चाहता नाही असा एकही व्यक्ती देशात शोधून सापडणार नाही. परंतु तुम्हाला माहिती आहे का , लतादीदींच्या आवाजातील गाणे ऐकून चक्क तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरुंच्या डोळ्यात अश्रु उभे राहीले होते.

“ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी”

हे महान गीत कवी प्रदीप यांनी रचले असून सी. रामचंद्र यांनी स्वरबद्ध केले आहे. हे गीत १९६२मध्ये भारत-चीन युद्धात शहीद झालेल्या जावानांना समर्पित केले होते. जवानांच्या बलिदानाने प्रेरित होऊन कवी प्रदीप यांनी हे गाणे रचले. दिल्लीच्या रामलीला मैदानात भारताच्या प्रजासत्ताक दिनी म्हणजे २६ जानेवारी १९६२ साली पहिल्यांदा लतादीदींच्या आवाजात हे गाणे गायले गेले. या कार्यक्रमासाठी तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहर लाल नेहरु देखील उपस्थित राहिले होते.

हे गीत पहिल्यांदा प्रेक्षकांसमोर लतादीदींच्या आवाजात गायले जाणार होते. हे गाणे ऐकून मैदानातील उपस्थित सर्व जण फक्त मंत्रमुग्ध झाले नाही, तर उपस्थित प्रत्येक व्यक्तींचे डोळे पाणावले. हे गाणे संपल्यानंतर पंडित जवाहर लाल नेहरुनी दीदींना म्टटले होते की, “बेटी, तूने मुझे रुला दिया”!

Related posts

राष्ट्रीय पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्तेच स्वीकारणार, कलाकारांनी केला इराणींना विरोध

swarit

‘डॉ. काशिनाथ घाणेकर’ला मल्टिप्लेक्समध्ये प्राईम टाईम शो नाही

swarit

Dahi Handi | स्मिता गोंडकर हिने फोडली सेलिब्रिटी हंडी

News Desk