HW News Marathi
देश / विदेश

राहुल गांधी यांना पाकिस्तानला मदत करायची आहे | रविशंकर प्रसाद

नवी दिल्ली | देशाच्या पंतप्रधानांवर राहुल गांधी यांनी केलेली टीका अपमानास्पद असून राहुल गांधी यांना राफेलची किंमत जाणून घेऊन पाकिस्‍तानला मदत करायची आहे, असा पलटवार कायदेमंत्री रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. गांधी कुटूंब हे स्वतः च भ्रष्‍टाचाराची जननी असून काँग्रेसच्याच काळात मोठमोठे घोटाळे झाले आहेत आणि यामुळेच त्यांच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले होते.

सध्या देशात राफेल करारावरून राजकीय वातावरण प्रचंड तापलेले आहे. विरोधी पक्षांकडून आणि विशेषतः काँग्रेसकडून सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी या प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्‍ला चढवत देशाचा चौकीदार चोर असल्याचा आरोप केला. त्यानंतर रविशंकर प्रसाद यांच्याकडून पत्रकार परिषद घेऊन सरकारची बाजू मांडण्यात आली आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका प्रामाणिक आणि मोठ्या नेतृत्वाला चोर म्हणून त्यांचा मोठा अपमान केला आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून कोणत्याही पक्षाच्या नेत्याने कधीही देशाच्या पंतप्रधानपदी असलेल्या व्यक्तीवर अशी अपमानास्पद टीका केलेली नाही, या शब्दात रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींवर टीका केली आहे.

या करारामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळणार आहे

फ्रान्‍सकडून केवळ ३६ राफेल घेण्यात येणार असून इतर भारतात बनवली जाणार आहेत. या करारामुळे देशातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. तसेच ही विमाने रिलाईन्‍सऐवजी इतर कंपन्या बनवतील असेही त्यांनी स्पष्ट केले. संपुआ सरकारपेक्षा शस्‍त्रास्‍त्रांसह विमाने २० टक्‍के स्‍वस्‍तात घेतलेली आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रचला इतिहास ! निर्मला सीतारामन देशाच्या पहिल्या पूर्णवेळ महिला अर्थमंत्री

News Desk

Gandhi Jayanti : गांधींच्या जयंतीनिमित्त नरेंद्र मोदींचा खास लेख

News Desk

ट्रम्प-जोंग यांच्या भेटीचा मुहूर्त अखेर ठरला

News Desk