HW News Marathi
देश / विदेश

धक्कादायक…जेट एअरवेजच्या फ्लाइटमधील प्रवाशांच्या कान-नाकतून रक्त

मुंबई | जेट एअरवेज फ्लाइटमधील क्रूच्या एका चुकीने १६६पेक्षा अधिक प्रवाशांच्या जीव धोक्यात आला. जयपूरला जाणारी ही फ्लाइट आज सकाळी (२० सप्टेंबर) मुंबईहून उड्डाण घेतल्याची माहिती समाचार एजेन्सी एएनआयीने दिली. जेट एअरवेजची मुंबई-जयपूर ही ९ डब्ल्यू ६९७ फ्लाइट टेकऑफनंतर मुंबईत परत उतरविण्यात आली.

कारण ही जेट एअरवेजच्या क्रूने टेकऑफ दरम्यान क्रूने केबिन प्रेशर सामान्य ठेवण्याचे बटन दाबण्यास विसरून गेले होते. त्यामुळे १६६ प्रवाशांपैकी ३० प्रवाशांच्या नाक आणि कानातून रक्त येऊ लागले. तर काही प्रवाशांना डोके दुखीचा त्रास जाणवू लागला. या सर्व प्रवाशांना मुंबई एअरपोर्टमध्ये उपचार सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संसदेत चाकू घेऊन प्रवेश करण्याचा अज्ञात व्यक्तीचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

News Desk

खुशखबर ! जिओ ग्राहकांना मिळणार ४के एलडी टीव्हीसह ४के सेट टॉप बॉक्स

News Desk

‘किंगमेकर’ भगतसिंह कोश्यारींच्या शब्दांचा मंत्रिमंडळ फेररचनेत ठसा 

News Desk
क्रीडा

आशिया चषकात भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

News Desk

आशिया चषकात भारतीय संघाने पाकिस्तानवर 8 गडी राखून मात केली आहे.

दुबई इन्टरनॅशनल स्टेडियमवरच्या या सामन्यावर भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व गाजवलं. या सामन्यात भारताने पाकिस्तानचा अख्खा डाव सर्व बाद 162 असा गुंडाळला.भारताकडून केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी तीन-तीन विकेटस काढून सर्वात प्रभावी मारा केला. जसप्रीत बुमराने दोन आणि कुलदीप यादवने एक विकेट काढली.भुवनेश्वरने गोलंदाजीची आक्रमक सुरुवात करत पाकिस्तानच्या सलामीवीर फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडलं. जबरदस्त फॉर्मात असलेल्या फखर जमानला खातंही उघडता आलं नाही. त्यानंतर इतर गोलंदाजांनीही पाकिस्तानच्या फलंदाजांना जेरीस आणलं.डळमळीत झालेल्या पाकिस्तानला शोएब मलिक आणि बाबर आझम यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा हा प्रयत्न अगोदर कुलदीप यादव आणि नंतर केदार जाधवने हाणून पाडला.

अष्टपैलू हार्दिक पंड्याला मैदानात दुखापत

अठराव्या षटकातील अखेरचा चेंडू टाकताना पंड्याला पाठीमध्ये उसण भरली. ही दुखापत एवढी गंभीर स्वरुपाची दिसत होती की पंड्याला मैदानाबाहेर चालतही जाता आले नाही. त्यामुळे त्याला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले.

भारताचा विजयी संघ

रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, अंबाती रायुडू, केदार जाधव/दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार, जस्प्रीत बुमरा, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव.

 

Related posts

क्रिकेट सामन्यादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने तरुणाचा मृत्यू

News Desk

मेरी कोमचा ऐतिहासिक विजय, सहाव्यांदा मिळवले सुवर्णपदक

News Desk

#MeToo: बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गट्टासोबत ही गैरवर्तन

swarit