HW News Marathi
मुंबई

Dahi Handi | दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू

मुंबई | मुंबईसह उपनगरात आज दिवसभर दहीहंडी उत्साहाने साजरी करण्यात येत आहे. मुंबई आणि ठाणे भागातील दहीहंड्या फोडण्यासाठी अनेक मंडळांमध्ये चुरस पाहायला मिळाली. मात्र, धारावीतील बाळ गोपाळ मित्र मंडळातील अंकुश खंदारे या गोविंदा जखमी झाला.

फिट आल्यामुळे अंकुश थरावरुन खाली पडला. त्यानंतर त्याला तातडीने सायन रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच कुशचा मृत्यू झाला. याशिवाय, आज दिवसभरात मुंबई आणि ठाण्यात ६० गोविंदा जखमी झाले आहेत. यापैकी ४० जणांवर अजूनही उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

येत्या २४ तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला

News Desk

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर महाराष्ट्रात सीबीएसईचा पेपर नाही!

News Desk

राणेंच्या काँग्रेसमधील भुमिकेविषयी अशोक चव्हाण साशंक?

News Desk
मुंबई

Dahi Handi | पथनाट्याच्या माध्यमातून पारंपारिक सणांची जनजागृती

News Desk

मुंबई | आयडियलने पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना डॉलबी आणि डीजे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदुषण होते. हे ध्वनी प्रदुषण मावनाच्या शरीरासाठी खातक असल्याचे वारंवार शासनाकडून सांगितले जाते. ध्वनी प्रदुषण रोखने ही काही शासनाची जबाबदारी नसून ही प्रत्येक नागरिकांची जबादारी असल्याचे सांगण्याचा प्रयत्न आयडियलने केला.

या पथनाट्यातून नागरिकांनी डीजे आणि डोलबीच्या नादात आपले पारंपारिक वाद्यांचा कुठे विसर पडला आहे. आपण पुन्हा एकदा आपण डोढल-ताशे, झाज आणि लेझीम या पारंपारिक वाद्यांच्या सहाय्याने आपल्या सण तितक्यात जोमाने साजराने साजरा करता येतात. हे नागिरीकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला.

शासनाकडून नेहमी नागिरकांना ध्वनी प्रदुषणाबदल जनजागृती करण्यात आली. ऐवढेच नाही तर ध्वनी प्रदुषण रोखण्यासाठी काही कडक नियम देखील बनविण्यात आले. जसे ६० डेसिबलच्यावर आवाज जाऊ नये. रात्री १० नंतर सार्वजिनक ठिकाणी ध्वनी प्रदुषण करू नये.

सामाजिक संदेश देणारी परंपरा

आयडियलची दहीहंडी ही ४१वर्षापासून नेहमीच लोकांच्या आकर्षनाचा केंद्र बिंदू राहिले आहे. ते नेहमीच नागरिकांना सामाजिक देश देणारी दहीहंडी असते. यामुळे आयडियलने त्यांचे वेगळपण ठिकवून ठेवले आहे.

यंदाच्या वर्षी इकोफेंडली दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.श्री साई दत्त मित्र मंडळ आणि आयडियल यांच्या संयुक्त विद्यामाने या दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

Related posts

रविवारी बेस्टचा संप तर रेल्वेचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल

News Desk

मुंबई आणि इतर महापालिकांच्या सदस्य संख्येत सुधारणा; मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला निर्णय

Aprna

मालाडच्या सोमवार बाजारमध्ये आग

News Desk