HW News Marathi
क्रीडा

विनोद कांबळी स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार 

मुंबई | बीच वॉरियर्स या ग्रुपकडून गेल्या अनेक महिन्यापासून मुंबईतील चौपट्या स्वच्छ करण्याचा उपक्रम सुरु आहे. दादर हे मुंबई शहरातील प्रचंड गर्दीचे आणि मोक्याचे ठिकाण असल्यामुळे दिवसभरात दादरमध्ये लाखो लोक येतात. दादरमध्ये येणा-या प्रत्येकासाठी दादर चौपाटी हे प्रमुख पर्यटनाचे ठिकाण असल्याचे मानले जाते. पण या चौपाटीची अवस्था पाहता येथे घाणीचे साम्राज्य अधिक वाढलेले दिसते. त्यामुळे या चौपाटीच्या स्वच्छतेसाठी चिनू कवात्रा बीच वॉरियर्स या ग्रुपने पुढाकार घेतला असून खेळाच्या माध्यमातून येत्या रविवारी दादर चौपाटीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत मोहिमेला देशभरात चांगला प्रतिसाद मिळत आहे. येत्या रविवारी क्रिकेट संघाचे माजी फलंदाज दादर चौपाटीच्या स्वच्छता मोहिमेत सहभागी होणार आहेत. भारतीय माजी फलंदाज विनोद कांबळी हा या मोहीमेचे सदिच्छादूत असणार आहेत. २ ऑक्टोबरला सकाळी ८:३० वाजता दादरच्या किर्ती महाविद्यालयापासून ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे. ‘Let’s clean & play together’ या थिमखाली ही स्वच्छता होणार आहे. स्वच्छतेबरोबर चौपाटीवर बीच बॉलिंग, बीच क्रिकेट आणि रस्सीखेच असे खेळ देखील खेळले जाणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पक्षपात बाजूला ठेवून ऊसतोड कामगार बांधवांची पारदर्शक पद्धतीने नोंद व्हावी – धनंजय मुंडे

News Desk

प्रवीण कुमारची आज क्रिकेटमधून निवृत्ती

News Desk

क्रिकेटर आयुष झिमरेने घेतली आठवलेंची भेट

News Desk
कृषी

 दूध संकलन बंद केल्याने शेतकरी संतप्त

News Desk

बुलडाणा | भंडारा येथील दूध प्रक्रिया केंद्र बंद झाल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील प्रमुख दूध संकलन केंद्र असलेल्या चिखली शहरातील दूध संकलन व शितकरण केंद्रावर मंगळवार पासून शेतकर्‍यांचे दूध स्विकारणे अचानक बंद केले आहे. या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात दूध संकलन केंद्रावर आणलेले दूध घरी परत नेवून त्याचे काय करायचे? असा प्रश्न शेतक-यांसमोर उभा राहीला आहे. संतप्त शेतकरी आणि पदाधिकार्‍यांनी दूध शितकरण केंद्रावरील अधिकारी व कर्मचार्‍यांना धारेवर धरून शेतकर्‍यांचे दूध संकलित केलेच पाहिजे असा आग्रह धरला.

मात्र वाद वाढत गेल्याने या शेतकरी आणि पदाधिकार्‍यांनी घरी नेवून दुधाचे नुकसान करण्यापेक्षा केंद्रावरील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दुधाने अंघोळ घालून निषेध व्यक्त केला. अखेर पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या समन्वयातून दुग्धव्यवसाय विभागाच्या वरीष्ठांशी चर्चा केल्यानंतर काहिसा सन्मानजनक तोडगा काढण्यात आल्याने संतप्त शेतकरी शांत झाले.

यावेळी बाजार समितीचे माजी सभापती डॉ.सत्येंद्र भुसारी, रयतचे जिल्हाध्यक्ष विनायक सरनाईक, राष्ट्रवादीचे शंतनू पाटील यांनी दुग्ध व्यवसाय विभागाच्या वरीष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा करून सहकारी दूध डेअरीने दूध गोळा केल्यानंतर दूध शितकरण केंद्रावर लगेचच निर्धारीत वेळेत आणून द्यावे तरच ते दूध स्विकारण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला आणि पदाधिकार्‍यांच्या समक्षच उपस्थित शेतकर्‍यांचे दूध स्विकारण्यात आले.

मात्र यापूर्वी संतप्त झालेल्या शेतकर्‍यांनी दूध घरी परत नेण्याऐवजी शितकरण केंद्रावरील अधिकार्‍यांना या दुधाने अंघोळ घातली. यावेळी डॉ.सत्येंद्र भुसारी, शंतनू पाटील, विनायक सरनाईक, शिवशंकर इंगळे, प्रशांत देशमुख, कृष्णा मुरकूटे, चेतन गायकवाड, संदीप शेळके, अशोक तायडे, रमेश टेकाळे, विलास पाटील, अविनाश पाटील, पांडुरंग शिंगणे, गणेश शिंगणे, विवेक ठाकरे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related posts

नांदेड जिल्ह्यातील विविध पाणी पुरवठा प्रकल्पांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुंबईतून ई-भुमिपुजन संपन्न

News Desk

‘किसान क्रांती पदयात्रा’ रोखण्यासाठी दिल्लीत लाठीमार, अश्रुधुरांचा वापर

swarit

पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत      

News Desk