HW News Marathi
कृषी

पंतप्रधान पीक विमा योजनेचा हप्ता भरण्यासाठी ३१ जुलै पर्यंत मुदत      

उत्तम बाबळे

नांदेड :- राज्यात खरीप हंगाम २०१७ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हयात भात, खरीप ज्वारी, तीळ, मुग, उडीद, तुर, सोयाबीन व कापुस या पिकांसाठी ही योजना लागु आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना पीक विमा उतरवण्याची अंतिम मुदत सोमवार ३१ जुलै २०१७ पर्यत आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषि अधिकारी किंवा जवळच्या बँकेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नांदेड यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत वास्तवदर्शी विमा हप्ता आकारण्यात येणार आहे. खरीप हंगामातील पिकांसाठी २ टक्के व कापसासाठी ५ टक्के ठेवण्यात आला आहे. जोखीम स्तर सर्व पिकांसाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणीपासुन काढणी पर्यंतचा कालावधी नैसर्गीक आग, वीज कोसळणे, गारपीट, चक्रीवादळ, पुर, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणी पश्चात नुकसान इत्यादी जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजना कर्जदार शेतकऱ्यांना अधिसुचीत क्षेत्रातील अधिसुचीत पिकांसाठी बंधनकारक असून, बिगर कर्जदार शेतकऱ्यांना इच्छिक आहे. जिल्हयात खरीप हंगाम २०१७ मध्ये ही योजना भारतीय कृषि विमा कंपनी लिमीटेड नवीन स्टॉक एक्सेंज बिल्डींग, २० वा मजला, दलाल स्ट्रीट, मुंबई यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे.

या योजनेअंतर्गत विमा संरक्षीत रक्कम व विमा हप्ता पुढील प्रमाणे राहणार आहे.

पीक विमा संरक्षीत रक्कम रु. / हेक्टर

शेतकऱ्यांनी भरावयाचा पिक विमा हप्ता (रु) ..भात- ३९,०००/-,७८०/-,ख.ज्वार – २४,०००/-,४८०/-,तुर -३०,०००/-,६००/-,मुग – १८,०००/-,३६०/-,उडीद -१८,०००/-,३६०/-,सोयाबीन – ४०,०००/-,८००/-,तीळ – २२,०००/-,४४०/-, कापुस – ४०,०००/-,२,०००/-.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुळ क्लस्टरसाठी निधी देऊ – वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार

News Desk

“शेती आणि मायबाप”

News Desk

‘किसान क्रांती पदयात्रा’ रोखण्यासाठी दिल्लीत लाठीमार, अश्रुधुरांचा वापर

swarit