HW News Marathi
मनोरंजन

सण नारळी पौर्णिमेचा

गौरी टिळेकर | श्रावणी पौर्णिमेचा हा दिवस भारतात विशेषतः समुद्रकिनारी राहणाऱ्या लोकांकडून ‘नारळी पौर्णिमे’चा सण म्हणून साजरा केला जातो. श्रावणी पौर्णिमेलाच नारळी पौर्णिमा असेही म्हणतात. नागपंचमीनंतर श्रावणात येणारा हा दुसरा सण. या दिवशी अर्पण करावयाचे नारळ हे फळ हिंदू धर्मात शुभसूचक मानलेले आहे. संगमापेक्षाही सागर जास्त पवित्र मानला जातो. सागराची पूजा म्हणजेच वरुणदेवतेची पूजा. होड्यांनी मासेमारीला जाताना वरुणदेव प्रसन्न असल्यास तो आपल्याला सहाय्य करतो, अशी कोळी बांधवांची श्रद्धा असते.

या दिवशी होड्याना रंगरंगोटी करून सजविण्यात येतात. काही ठिकाणी तर कोळी बांधवांकडून भव्य मिरवणुका देखील काढण्यात येतात. या दिवशी समुद्राला श्रीफळ अर्पण करून त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची हिंदू धर्मात प्रथा आहे. पावसाळा हा माश्यांच्या प्रजननाचा काळ असल्याने कोळी बांधव या काळात मासेमारी करत नाहीत. श्रावणी पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले कि त्यानंतरच समुद्रात होड्या घेऊन मासेमारी सुरु होते. नारळातील पाण्यात तेजतत्त्वाचे प्रमाण अधिक असते. वरुणदेवतेला आवाहन करताना तिच्या कृपाशीर्वादाने यमलहरी नारळाच्या पाण्याकडे आकृष्ट होतात, असे मानले जाते. म्हणून सागररूपी वरुणदेवतेच्या चरणी त्यांचे समर्पण करण्याला महत्त्व आहे.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईमधील कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेच्या तयारीची लगबग जास्त प्रमाणात पाहायला मिळते. नैवेद्यासाठी कोळी महिला ओल्या नारळाच्या करंज्या, नारळी भात, नारळी पाक असे पदार्थ बनविण्यात येतात. सर्वप्रथम नारळ मंदिरात ठेवून सर्व कोळी मंदिरांमध्ये एकत्र जमतात. त्यानंतर दर्याराजाला नारळ अर्पण करून आपले गाऱ्हाणे मांडणार आहेत. दर्याचे धन माझ्या होरीला येऊ दे अशी मागणी केली जाते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ज्येष्ठ अभिनेत्री शुभांगी जोशी यांचे निधन

News Desk

BREAKING NEWS | जेष्ठ रंगकर्मी विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड

News Desk

विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड…

Manasi Devkar
मुंबई

ईदच्या दिवशी अचानक झालेल्या अपघातामुळे वाहतुकीचा खोळंबा

News Desk

मुंबई | मुंबईसह देशभरात आज रमजान ईदचा उत्साह पहायला मिळत आहे. अनेक सरकारी कार्यालयांना सरकारी सुट्टी देण्यात आली असली तरीही प्रायव्हेट कंपन्यांचे कर्मचारी सकाळी कामावर जाताना पहायला मिळाले. सकाळी नमाज अदा करण्याची वेळ असल्यामुळे मुंबईसह उपनगरात मशिदीबाहेर मुस्लिम बांधवांनी एकच गर्दी केली होती. ईद निमित्ताने पाहुण्या रावळ्यांकडे जाण्याची घाई असल्याने मुंबईकरांना ट्रॅफीक चा सामाना करावा लागला. त्यातच अंधेरी चकाला येथे दुचाकी आणि महापालिकेच्या कचरा गाडीच्या झालेल्या अपघातामुळे या मार्गावर बराच वेळ ट्रॅफीक जाम झाल्याचे चित्र पहायला मिळाले.

चकाल्यावरुन जे. बी. नगरच्या दिशेने जात असलेल्या MH 02 DX 5021 ही दुचाकी महापालिकेच्या कचरा गाडीला MH 01 BR0048 धडकल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीचे प्रंचड नुकसान झाल्याचे पहायला मिळाले. या अपघातामुळे सकाळी ऑफीसला जाणा-या अनेकांचा बराच वेळ खोळंबा झाला होता. या अपघातानंतर काही क्षणात पोलिस घटनास्थळी हजर झाले आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. यानंतर पोलिसांच्या मध्यस्थीने दुचाकी स्वार आणि महापालिका सुपरवाईजर यांनी सेटलमेंट केली. यासंदर्भात अधिक विचारणा केली असता दुचाकीस्वार अॅडव्होकेट अबु खान यांनी महापालिका झालेल्या नुकसानाची भरपाई देणार असल्याचे HW मराठी शी बोलताना सांगितले.

Related posts

मुंबईतील चौपाट्या आता लवकरच होणार चकाचक

swarit

आज मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक, कल्याण ते अंबरनाथदरम्यान पॉवरब्लॉक

News Desk

उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने केलीआत्महत्या

swarit