HW News Marathi
महाराष्ट्र

आदित्य ठाकरेंना खड्यांचा फटका, आलिशान रेंजरोव्हरचे फुटले टायर

नाशिक | युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या गाडीला रस्त्यावरच्या खड्ड्यांचा फटका बसला आहे. दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी नाशिकला जात असलेल्या आदित्य ठाकरे यांच्या आलिशान रेंजरोव्हर गाडीचे टायर घोटीजवळ आल्यानंतर फुटल्याची घटना घडली आहे. त्यामुळे दुसऱ्या गाडीने त्यांना हॉटेलला पोहोचावे लागल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबई-नाशिक रस्त्यावरील घोटीजवळील पाडळी गावात ही घटना घडली. पाडळीच्या रस्त्यावर खूप मोठे खड्डे आहेत. या खड्ड्यांमधून जाताना त्यांच्या गाडीचे टायर फुटल्याचे सांगितले जात आहे. खड्ड्यांचा त्रास तुम्हा-आम्हाला नवीन नाही. पण जेव्हा आदित्य ठाकरेंसारख्या राजकीय नेत्याच्या गाडीचे टायर मध्यरात्री फुटते, तेव्हा मात्र सोबतच्या सुरक्षा यंत्रणांची तारांबळ उडते.

या घटनेनंतर दुसऱ्या गाडीने आदित्य ठाकरे मुक्कामासाठी हॉटेलवर पोहोचले. त्यानंतर टायर फुटलेली गाडी टोईंग करुन नाशिकमध्ये आणली गेली आणि दोन्ही टायर बदलण्यात आले.

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या गाडीचं टायर फुटण्याची घटना ज्या घोटी परिसरात घडली, त्याच परिसरातील दुसऱ्या रस्त्यांची खूपच दुर्दशा झाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय कुमार यांची मुख्य सचिव पदावर नियुक्ती, तर अजोय मेहता मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार

News Desk

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नगराळेंनी का घेतली राज्यपालांची भेट?

News Desk

राज्यात १०वीचा निकाल जाहीर, एकूण निकाल ९५.३०% तर, कोकण विभागाने मारली बाजी !

News Desk
मुंबई

पोलिसांची दडपशाही, छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांची धरपकड

News Desk

मुंबई – परवानगी नाकारल्यानंतरही कार्यक्रम घेण्यावर ठाम असलेल्या छात्रभारतीच्या कार्यकर्त्यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. तसेच या भागात जमावबंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर राज्यभरात उसळलेला हिंसाचार लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे.पोलिसांनी धरपकड सुरु केल्यानंतर जमाव पांगला. सध्या छात्रभारतीचे कार्यकर्ते गोरेगावच्या दिशेने जात आहेत.

पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही कुठल्याही परिस्थितीत हा कार्यक्रम होणारच अशी भूमिका छात्रभारतीने घेतली त्यामुळे संघर्ष झाला. ही दडपशाही असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला.

Related posts

राज्यातील 137 वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या

News Desk

मोनोरेलमध्ये टक्कर , दोन मोनोरेल एकाच ट्रॅकवर

News Desk

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, कोपर स्थानकाजवळ रेल्वे रुळाला तडे

News Desk