HW News Marathi
महाराष्ट्र

अमोल काळे, वीरेंद्र तावडे दाभोलकरांच्या हत्येचे सुत्रधार | सीबीआय

मुंबई | अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (२० ऑगस्ट)ला पाच वर्षे पुर्ण झाली आहे. अमोल काळे आणि वीरेंद्र तावडे हे दोघे दाभोलकर यांच्या हत्येचे सुत्रधार असल्याचा दावा सीबीआयने केला आहे. दाभोलकरांच्या पाचव्या स्मृतिदिनी राज्यभरातील विविध ठिकाणी रॅली काढण्यात येणार आले आहे. पुण्यातील ओंमकारेश्वर पूल ते साने गुरुजी स्मारक या मार्गावरून ‘जवाब दो’ निषेध रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.

कशा प्रकारे झाली दाभोलकरांची हत्या

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी अमोल काळेनी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना शस्त्र पुरविली. आणि मोटारसाईकलची सोय केली. दाभोलकरांच्या हत्येच्या १० दिवस आधी अमोल काळे यांनी परिसराची रेकी केली. कुठे कुठे सीसीटीव्ही आहे का?, याची पाहणी केली. दाभोलकरांचा प्रमुख सुत्रधार वीरेंद्र तावडे असल्याचे सीबीआयने सांगितले.

हत्येपुर्वी शरद कळसकर आणि सचिन अंदुरे औरंगाबादमधून पुण्याच्या दिशेने रवाना झाले.

पुण्यात आल्यानंतर दोन बंदुक आणि मोटर सायकल देण्यात आले. ओंकारेश्वर पुलाजवळील या दोघांसाठी पाईक पार्क करण्यात आली. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी दाभोलकर ओंकारेश्वर पुलाजवळ पोहोचले. तेव्हा सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांनी दोन राऊंड फायर केली. दाभोलकरांची हत्या करून सायंकाळी ५ वाजता औरंगाबादला पोहोचले असल्याची माहिती सीबीआयने दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डरवर गुन्हा दाखल

Aprna

भारतीय मेरिटाइमच्या सुरक्षततेसाठी भारतीय नौदल कटिबद्ध – व्हाईस ऍडमिरल गिरीश लुथरा

News Desk

रोहित पवारांनी उपस्थित केला भाजपच्या संस्कारांवर प्रश्न!

News Desk
मुंबई

मुलुंड-ऐरोली टोलनाक्यांवरील टोल वसुली महिन्याभरासाठी बंद

swarit

मुंबई | मुंब्रा बायपास रोडचे काम सुरु असल्याने मुलुंडमधील दोन टोलनाके तर ऐरोलीतील एक टोलनाक्यांवरची टोलवसुली बंद करण्यात आली आहे. परंतु ही टोलवसुली फक्त लहान वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापामुळे राज्य सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ही टोलवसुली साधारण महिन्याभरासाठी बंद राहील. म्हणजेच २१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत लहान वाहनांची टोल वसुली बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ही टोलवसुली बंद करण्याची मागणी करून स्वतः देखील हे टोलनाके बंद पडण्याचा प्रयत्न केला होता.

Related posts

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

Aprna

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk