HW News Marathi
महाराष्ट्र

मुंबईसह राज्यभरात पुन्हा पावसाचा जोर

मुंबई | गेल्या अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर मुंबईत पुन्हा पावसाने जोर धरला आहे. मुंबईत अंधेरी, बोरिवली, जोगेश्वरी, ठाणे, कुर्ला, विक्रोळीसह लालबाग, परळ, दादर तसेच नवी मुंबईतही पावसाचा जोर वाढला आहे. येत्या २४ तासात मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे. तसेच कोकण आणि विदर्भातही काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली जात आहे.

संपूर्ण राज्यभरात सुरु असलेल्या या पावसामुळे शेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील धरण क्षेत्रात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे तेथील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला गेला आहे. आजही राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली गेली आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केरळमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने निर्माण पूरपरिस्थितीमुळे आतापर्यंत ३८५ जण मृत्युमुखी पडले आहेत. केरळमधील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडून ५०० कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१०वी, १२वी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा

News Desk

भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यावर लाठीमाराबद्दल कारवाई करा प्रसाद लाड अन्यथा…!

News Desk

सत्तेसाठी शिवसेनेने सगळी तत्वे गुंडाळून मातोश्रीच्या एका कोपऱ्यात ठेवली !

News Desk