HW News Marathi
देश / विदेश

पथनाट्याच्या माध्यमातून जागतिक स्तनपान सप्ताह होतोय साजरा 

मुंबई | ऑगस्ट महिन्याची सुरुवात स्तनपान सप्ताहाने होत असते. १ ते ७ ऑगस्ट हे दिवस जागतिक स्तरांवर जागतिक स्तनपान सप्ताह म्हणुन साजरा होत असतो जगभरातील १२० पेक्षा अधिक राष्ट्र हा सप्ताह साजरा करत असतात. या स्तनपान सप्ताहाची सुरुवात १९९२ साली झाली आणि प्रामुख्याने जागतिक पातळीवर विविध व्यक्ती, संस्था, संघटनाच्या माध्यमाने स्तनपानविषयक जनजागृती या सप्ताहात केली जाते.
स्तनपानविषयक जनजागृती करण्याच्या उद्देशाने फाउंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ संस्थेने पथनाट्याच्या माध्यमाने भिवंडी निजामपुर महानगरपालिका क्षेत्रांतील एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत अंगणवाड्या, नागरी आरोग्य केंद्राच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्तनपान विषयक जनजागृती केली. प्रामुख्याने कापड कारखाने, स्थलांतरित समाज, अपुऱ्या आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध असलेल्या भिवंडी शहरांत अस्वच्छता आणि कुपोषणाचे प्रमाण अधिक आहे.
गरिबी त्याचबरोबर पाणी आणि विजेची मोठी समस्या असलेल्या भिवंडी शहरातील अनेक नागरी वस्ती समुदायात फाउंडेशन फॉर मदर अँड चाईल्ड हेल्थ संस्था माता आणि बालकांच्या पोषण आणि आरोग्य विषयक प्रश्नांवर काम करते. नवजात बालकास जन्माच्या एका तासांत आईचे दूध पाजणे त्याचबरोबर पहिल्या सहा महिन्यापर्यंत फक्त आणि फक्त आईचे दूध पाजणे आवश्यक आहे हा संदेश वस्तीतील स्तनदा माता आणि त्यांच्या कुटुंबाला यावेळी पथनाट्याच्या माध्यमाने देण्यात आला.
कुपोषणाचे अधिक प्रमाण असलेल्या काही वस्त्या आणि स्तलांतरित समाजाच्या वस्तीत जावून संस्थेचे वस्ती संघटक स्तनपान विषयक माहिती प्रात्यक्षिकांच्या माध्यमाने लोकांना देत आहेत. स्तनपान हे नवजात बाळाचे पहिले लसीकरण असते त्याचबरोबर आईच्या दुधात बाळाला आवश्यक सर्व पौष्टीक घटक समाविष्ट असतात त्यामुळे बाळाला पाणी, मध किंवा इतर कोणतेही पातळ पदार्थ सहा महिन्यापर्यंत देवू नये असे आवाहन देखील हे वस्ती संघटक लोकांना करत आहेत. पूर्वापार चालत आलेल्या स्तनपान विषयक चुकीच्या सवयी त्याचबरोबर लोकांमध्ये असलेले गैरसमज दूर व्हावेत आणि स्तनपान अभावी कोणतेही बाळ कुपोषणाचे बळी पडू नये यांसाठी आमचे हे प्रयत्न चालू आहेत असे यावेळी वस्ती संघटकांनी सांगितले.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणूक आयोगाच्या ‘त्या’ नोटीसला अभ्यास करून उत्तर देणार !

Gauri Tilekar

काश्मीरमध्ये आठ जवान शहीद

News Desk

भारतात कोरोना ग्रस्तांची संख्या २८ वर, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

swarit
मुंबई

शाश्वत विकासासाठी युवकांच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान समुदायाची सुरुवात

swarit

मुंबई | शहरी ग्रामीण त्याचबरोबर आदिवासी समुदायातील स्थानिक आणि जगभरातील तरुणांना जोडुन घेण्याची आणि शाश्वत काम उभारण्याची संकल्पना डॉ प्रभा तिरमारे यांनी कल्याणच्या टीम परिवर्तनच्या युवक मंडळीसमोर मांडली आणि युवकांच्या आंतरराष्ट्रीय ज्ञान समुदायाची IKCOYNS सुरुवात झाली. या युवकांचे पहिले निवासी शिबीर नुकतेच साद फाउंडेशनच्या मदतीने बेडीसगाव वांगणी येथे पार पडले.

युवकांमध्ये असलेले ज्ञान आणि माहितीचे संवर्धन व्हावे त्यांच्या क्षमता आणि कौशल्यांचा विकास व्हावा आणि परिवर्तनशील विकासासाठी युवकांना योग्य दिशा मिळावी या उद्देशाने टीम परिवर्तन या युवकांच्या गटाने हे शिबीर आयोजित केले. सध्याची शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीचा युवकांनी अभ्यास करावा विचारांचे आदानप्रदान व्हावे आणि त्यांतून स्थानिक पातळीवरील सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा या हेतुने महाराष्ट्रभरातील अनेक युवक या शिबिरास उपस्थित होते.

शिबिरात एकलव्य गावं तिथे ग्रंथालय या विषयांवर तेजश्री देवडकर आणि तुषार वारंग अंघोळीची गोळी या विषयांवर सागर वाळके आणि चेतन पाटील तर टीम परिवर्तनच्या विविध मोहिमांची माहिती नामदेव येडगे आणि भुषण राजेशिर्के यांनी शिबिरार्थ्यांना दिली. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे अंधश्रद्धा निवारण्याचे काम आणि विविध उपक्रम मा. उत्तम जोगदंड तर कायद्याने वागा लोकचळवळ आणि युवकांची सध्याच्या राजकीय वातावरणातील भुमिका राज असरोंडकर आणि राकेश गायकवाड यांनी यावेळीं युवकांसमोर मांडली. साद फाउंडेशनच्या कामांची माहिती प्रदीप कुलकर्णी आणि माधुरी पुराणिक यांनी युवकांना सांगितली. शिबिरात युवकांना सर्पमित्र दत्ता बोंबे, सुहास पवार आणि हितेश करंजगावकर यांनी सर्पांविषयी असलेले समज गैरसमज समजावुन सांगितले शिवाय यावेळीं सर्पचित्र प्रदर्शन देखील भरवण्यात आले होते.

समाजातील विविध प्रश्न आपल्या विद्रोही गाण्याने स्वप्नील शिरसाठ आणि रोहीत जगताप यांनी युवकांसमोर मांडली. शाश्वत विकासासाठी युवकांच्या समुदायाची ही सुरुवात असुन यापुढें आम्हीं युवककेंद्रीत गट तयार करून ग्राम शहरी अध्ययन शिबीर, सामाजिक पर्यटन, सायकल बँक, शाश्वत आणि अद्ययावत माहिती केंद्रे, आरोग्य आणि क्रीडा विषयक अनेक संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सामूहिकरीत्या काम करणार आहोत असे यावेळीं शिबीर समन्वयक अविनाश पाटील यांनी सांगितले.

Related posts

रविवारी बेस्टचा संप तर रेल्वेचा मेगाब्लॉक, मुंबईकरांचे हाल

News Desk

लोया प्रकरणाचे सत्य बाहेर कधी येणार | पृथ्वीराज चव्हाण

News Desk

धारावीतील कोळीवाड्यांचे सीमांकन करून डी आर पी योजनेत समाविष्ट करा | चंद्रकांत पाटील

News Desk