HW News Marathi
राजकारण

गणेशोत्सवात कोकणात जाण्यासाठी एसटीच्या २२२५ बस

मुंबई | यंदाच्या गणेशोत्सवात मुंबई प्रदेश क्षेत्रातील चाकरमान्यांना त्यांच्या कोकणातील गावी सुखरूप सोडण्यासाठी एसटीने २२२५ बसेसची सोय केली आहे. सुखरुप प्रवासाच्या दृष्टीने कोकणातील नागरीकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी केले आहे.

ऑगस्टपासून ग्रुप बुकिंग तर ९ ऑगस्ट पासून संगणकीय आरक्षण सुविधा सुरू करण्यात येणार आहे. ग्रुप बुकिंगसाठी (संघटित आरक्षण) संबंधितांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या नावाच्या यादीसह आपल्या जवळच्या आगारात संपर्क साधू शकतात. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना अधिक सुविधा म्हणून राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने ८ सप्टेंबर ते १२ सप्टेंबर या कालावधीमध्ये नियमित वाहतुकीशिवाय जादा बसेस सोडण्यात येणार आहेत. कोकणातील महामार्गावर ठिकठिकाणी ‘वाहन दुरुस्ती पथक ‘ (ब्रेक डाउन व्हॅन) तैनात करण्यात येणार आहेत. तसेच प्रवाशांसाठी तात्पुरत्या स्वरूपाची स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत.

कोकणातील सावंतवाडी, मालवण,कणकवली,देवगड, विजयदुर्ग, राजापूर, लांजा, पाली, संगमेश्वर, रत्नागिरी, चिपळूण, गुहागर, खेड, दापोली, श्रीवर्धन, पेण, अलिबाग व आजूबाजूच्या परिसरात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांनी सुरक्षित प्रवासासाठी आपल्या प्रवासाची तारीख व वेळ ठरवून संबंधित आगारांशी संपर्क साधण्याचे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोकणातून नाणारचा राक्षस घालवल्याबद्दल उद्धव ठाकरेंकडून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन

News Desk

अयोध्येत भव्य राम मंदिर उभारणारच! – उद्धव ठाकरे

swarit

स्मारकांसाठी खर्च केलेले जनतेचे पैसे परत करा, मायावतींना न्यायालयाचा धक्का

News Desk
मुंबई

विद्यार्थ्यांच्या श्रमदानातून ३७० झाडांचे वृक्षारोपण

News Desk

मुंबई | जाणीव चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित ‘जाणीव वसुंधरेची ‘ या प्रकल्पा अंतर्गत लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग हॉस्पिटल, वसई येथे वृक्षारोपणाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये जाणीव ट्रस्टचे पदाधिकारी, साठ्ये महाविद्यालयाच्या NSSयुनिट व Ncc युनिटचे विध्यार्थी, साठ्येचे माजी विद्यार्थी , वर्तक कॉलेज, सेंट पीटर्स कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल जुनियर कॉलेज अशा विविध संस्थांमधून १२५ विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.

यावेळी ३७० झाडांचे वृक्षारोपन करण्यात आले. यामध्ये मोगरा व आंबा या झाडांचा समावेश होता. लोकनायक जयप्रकाश नारायण कुष्ठरोग निर्मुलन संस्था यांनी ही रोपे उपलब्ध करून दिली होती . डॉ जगदीश सामंत यांना आदरांजली वाहून सर्व स्वयंसेवकांना विविध गटांमध्ये विभागणी करून झाडे व हत्यारे घेऊन सर्वजणांनी सकाळी साडेदहा च्या सुमारास वृक्षारोपणाला सुरवात केली. दीड वाजेपर्यंत वृक्षारोपण केले व सर्वांनी तेथे एकत्रित भोजनाचा आनंद घेतला व पुन्हा जोमाने साडेचार वाजेपर्यंत वृक्षारोपण केले, त्यानंतर लोकनायक ट्रस्टच्या ट्रस्टींनी मुलांशी सुसंवाद साधत वृक्षारोपणाची आपल्याला प्रदूषणावर तसेच ग्लोबल वॉर्मिंग वर मात करण्यासाठी आज आपण केलेले काम किती प्रशंसनीय आहे हे सांगत आपण सर्वांनी लावलेल्या झाडांची जवाबदारी संस्था घेईल व आपण सर्वांनी वेळात वेळ काढून येथे येऊन झाडांची काळजी घ्यावी याची सर्वांना जाणीव केली, सर्व उपस्थितांनी ही जवाबदारी आम्ही घेऊ असे आश्वासन दिले, त्यानंतर सुनिल पाठक (ट्रस्टी, जाणीव) यांनी डॉ सामंत यांचा वसा आपण चालवत आहोत असे सांगत सर्वांना ट्रस्ट व ट्रस्टच्या कार्यक्रमाबद्दल माहिती दिली व कार्यक्रमाच्या नियोजन व त्यामागील उद्दिष्टांची सर्वांना माहिती दिली.

मुंबई जिल्हा समन्वयक NSS विनोद गवारे (सहाय्यक प्राचार्य साठ्ये महाविद्यालय) यांनी उस्फुर्तपणे प्रेरणागित घेत आपली व समाजाच्या प्रति असलेली बांधिलकी दाखवून दिली. प्रा बबन मोहिते, सचिन शिगवण व प्रा गौरांग राजवडकर , प्रा कस्तुरी मेढेकर (साठ्ये महाविद्यालय), जिल्हा समन्वयक प्रा भीमराव पेडकर वर्तक कॉलेज, प्रा वैती सेंट पीटर कॉलेज, प्रा अभ्यंकर न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज यांनी सर्वांना मार्गदर्शन केले, जाणीव ट्रस्ट च्या वतीने सर्वांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. जाणीव ट्रस्टच्या सुनील पाठक यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी योगेश पाटील, डॉ परुळेकर (लोकनायक जयप्रकाश नारायण ट्रस्ट) व राम परब, आरती पाठक (ट्रस्टी जाणीव) आणि मयूर पवार या सगळ्यांनी बहुमूल्य सहकार्य केले.

Related posts

१ ऑक्टोबरपासून राजभवन भेट पुन्हा सुरु

Manasi Devkar

मुंबईच्या महापौरांचे स्थलांतर आता राणीच्या बागेत

Gauri Tilekar

पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा २३ पैशांची वाढ

News Desk