HW News Marathi
महाराष्ट्र

मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता आरक्षण द्यावे

मुंबई | भाजप सरकारने मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाची वाट न बघता मराठा समाजाला आरक्षण द्याला हवे, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्यावर आज शिवसेनेने त्यांच्या आमदार आणि पदाधिकाऱ्यांसबोत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने तातडीने विधिमंडळाचे विशेष अविशेन बोलवावे. आणि सरकारने आरक्षणासाठी घटना दुरुस्तीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवावा असे उद्धव ठाकेर यांनी सांगितले. मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून शिवसेनेचे आमदार आज दुपारी ४ वाजता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचे देखील ठाकरे यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जळगाव : जिल्हा वार्षिक आदिवासी उपयोजना अंतर्गत १० कोटींची वाढ पालकमंत्र्यांच्या मागणीला यश

News Desk

मुख्यमंत्र्यांबद्दल केलेल्या ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यानंतर शेलारांचा माफीनामा

swarit

एक दिवस आपला मेळावा शिवतिर्थावर घेतल्याशिवाय राहणार नाही – पंकजा मुंडे

News Desk
देश / विदेश

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमध्ये दिवसेंदिवस दहशतवादी कारवाया वाढत आहेत. काश्मीरमधील कुलगाम येथे रविवारी पहाटेच्या सुमारास सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. या चकमकीत जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या परिसरात अजून काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे सुरक्षा दलाने या परिसरातील दहशतवाद्यांची शोध मोहीम सुरू आहे.

जम्मू काश्मीर पोलीस दलातील पोलीस शिपाई सलीम शाह यांचे शनिवारी सकाळी दहशतवाद्यांनी अपहरण करून निर्घृण हत्या केली. शहीद सलीम शाह दक्षिण काश्मीरमधील कुलगामचा रहिवासी होता. पोलीस दलातील जवानांच्या अपहरण करून हत्या केल्याने संपूर्ण काश्मीरमध्ये एकच खळबळ उडाली होती. त्यांचा मृतदेह कुलगाम परिसरात आढळून आला. सलीम हा कथुआमध्ये कार्यरत असून तो सध्या रजेवर होता. दहशतवाद्यांनी कुलगाम जिल्ह्यातील मुथलामा भागातील सलीमला त्यांच्या घरातून अपहरण केले होते.

जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील जवानांना अपहरण करुन त्यांची हत्या करण्यात आलेली ही पहिली घटना नाही. या आधी ईदच्या सुट्टीसाठी परतत असताना दहशतवाद्यांनी मुघल रोडवरून त्यांचे अपहरण केले होते. औरंगजेब हा ४४ राष्ट्रीय रायफल्सचे जवान असून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

 

Related posts

नागरिकत्व विधेयकाविरोधात शहांवर निर्बंध लादण्याची अमेरिकन आयोगाची मागणी

News Desk

पाकिस्तानला नरेंद्र मोदीशिवाय चांगला पंतप्रधान मिळू शकणार नाही !

News Desk

राहुल गांधींचा वाढदिवस राज्यभर ‘संकल्प दिवस’ म्हणून साजरा करणार ! नाना पटोले

News Desk