HW News Marathi
देश / विदेश

ईदच्या दिवशी जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचाराच्या घटना

श्रीनगर | काश्मीर मधील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले आहे. या गोळीबारात लष्कराचे जवान बिकास गुरुंग शहीद झाले आहेत. रमजान ईदच्या दिवशी पुन्हा एकदा जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार झाल्याचे पहायला मिळत आहे.

तसेच दक्षिण काश्मीरच्या अनंतनागमध्ये ईद निमित्त नमाज अदा केल्यानंतर काही लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्या लोकांनी सुरक्षा दलाच्या ताफ्यावर अचानक दगडफेक केली. त्यांच्या हातात पाकिस्तान आणि आयएसचे झेंडे दिसून आले. जमावावर दगडफेक करणारे पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देत होते. त्यांना रोखण्यासाठी सुरुक्षा दलाला हवेत गोळीबार करावा लागला. सध्या या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नौशेरा सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानच्या गोळीबारात लष्करातील एक जवान शहीद झाला. तसेच अरनिया सेक्टरमध्ये शनिवारी सकाळी चार वाजता पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लघन करण्यात आले. याला बीएसएफनेही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अरविंद केजरीवाल घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ

swarit

ममता बॅनर्जी झाशीची राणी नाही तर पुतना मावशी !

News Desk

रात्री १० नंतरही मी फटाके फोडणार !

Gauri Tilekar
महाराष्ट्र

भिडेंच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलकडून निषेध

News Desk

पुणे | वंध्यत्वावर आंब्याचा उपाय सांगणा-या संभाजी भिडे यांच्या वक्तव्याचा पुणे राष्ट्रवादी काँग्रेस च्या डॉक्टर सेलकडून निषेध करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी याबाबतचे प्रसिद्धीपत्रक प्रसिद्धी माध्यमांना शनिवारी दिले आहे.

संभाजी भिडे यांनी केलेले वक्तव्य शास्त्रीय आधारावर नाही. तसेच हे वक्तव्य समाजाची दिशाभूल करणारे असल्याचे म्हणत शासनाने संभाजी भिडे यांच्यावर कारवाई करावी, असे डॉ. जगताप यांनी या पत्रकात म्हटले आहे. मुलगाच होण्याबद्दल जाहीर वक्तव्य केले जाते, आणि अद्याप त्यावर कारवाई होत नाही, हे खेदजनक आहे, असेही या पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

 

Related posts

कोकणासह नवा महाराष्ट्र घडवू या !

swarit

योगी आदित्यनाथद्वारा लोकसंख्या नियंत्रणाचा अ‍ॅक्शन प्लॅन जाहीर

News Desk

कोरोनाचा गैरफायदा घेत मुंबईतील ५०० गृहनिर्माण सोसायट्या बिल्डरच्या घशात, शेलारांचा आरोप

News Desk