HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर विधिमंडळाच्या नेत्यांची होणार बैठक

मुंबई | राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. त्यामुळे त्यांनी आज विधिमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांची त्या संदर्भात बैठक बोलविली आहे.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या काही दिवसात राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाला काही ठिकाणी हिंसक वळण लागले. एका मराठा आंदोलकाने जलसमाधी घेत प्राण गमावले. तर काही जणांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राज्यांत मोठ्या प्रमाणात झालेली आंदोलनाची कोंडी फोडण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांना विश्वासात घेण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गुरुवारी रात्री झालेल्या भाजपाचे मंत्री आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळातील सर्वपक्षीय नेत्यांची शनिवारी बैठक आयोजित करण्यात आली असून, त्यात शिवसेनेचाही देखील समावेश असणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नवजात शिशुला अज्ञात इसमाने फेकले नाल्यात

News Desk

भाजपचे १२ निलंबित आमदार पोहोचले सर्वोच्च न्यायालयाच्या दारी!

News Desk

ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं निधन, साधी राहणी असलेला नेता हरपला.

News Desk
देश / विदेश

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तिवारी यांचे निधन

News Desk

दिल्ली | उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एन.डी. तिवारी यांचे गुरुवारी दुपारच्या सुमारास निधन झाले. मृत्यूसमयी ते ९३ वर्षांचे होते. दिल्लीच्या मॅक्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

नारायण दत्त तिवारी यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९२५ ला झाला होता. काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आंध्र प्रदेश राज्याचे २००७ पासून राज्यपाल होते. ते मार्च २००२ ते मार्च २००७ या काळात उत्तरांचलचे आणि जानेवारी १९७६ ते एप्रिल १९७७, ऑगस्ट १९८४ ते सप्टेबर १९८५ आणि जून १९८८ ते डिसेंबर १९८८ दरम्यान उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. अशाप्रकारे दोन राज्यांचे मुख्यमंत्रापद भुषविण्याचा मान त्यांना मिळाला.

१९८० च्या लोकसभा निवडणुकीत लोकसभेवर निवडून गेले. त्याचबरोबर जून १९८० ते जुलै १९८१ या काळात ते नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष होते.त्यानंतर ऑक्टोबर १९८० ते फेब्रुवारी १९८३ या काळात त्यांनी केंद्र सरकारमध्ये कामगारमंत्री, उद्योगमंत्री, अवजड उद्योगमंत्री आणि कायदामंत्री ही पदे भूषविली. तसेच जून १९८५ ते ऑक्टोबर १९८६ या काळात ते पेट्रोलियम मंत्री,ऑक्टोबर १९८६ ते जुलै १९८७ या काळात ते परराष्ट्रमंत्री आणि जुलै १९८७ ते जून १९८८ या काळात ते अर्थमंत्री होते.

Related posts

सलग तीन दिवस राज्यातील सत्तांतरावर युक्तीवाद पूर्ण; सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला निकाल

Aprna

Union Budget 2021 | नाशिक आणि नागपूर मेट्रोसाठी केंद्राकडून अर्थसंकल्पात हजारो कोटींची तरतूद

News Desk

हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला

Darrell Miranda