HW News Marathi
मुंबई

लोअर परळचा पूल आजपासून बंद, चाकरमान्यांचे हाल

मुंबई | अंधेरी पूर्व दुर्घटनेनंतर आता लोअर परळचा पूल धोकादायक असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आजपासून हा पूल दुरुस्तीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून दुरुस्तीपर्यंत हा पूल बंद राहणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे.

पश्चिम रेल्वेचा हा पूल लोअर परळ स्थानकाजवळ असून ६४ डिग्रीतून तो रुळांना तिरका क्रॉस करून बांधला आहे. १७ जुलै रोजी या पुलाची आयआयटी मुंबई, महापालिका अधिकारी आणि रेल्वे प्रशासनाने प्राथमिक सुरक्षा तपासणी केल्यानंतर हा पूल तातडीने बंद करण्याची सूचना देण्यात आली होती. त्यामुळे पश्चिम रेल्वेने या पुलाच्या पुनर्बांधणीसाठी स्ट्रक्चरल इंजिनीअर्स आणि सल्लागाराच्या सुचनेनुसार आजपासून हा पूल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या पुलाची लांबी ६२.७२ मीटर व रुंदी २३.२० मीटर इतकी आहे.

लोअर परळ स्थानकाबाहेर नागरिकांची गैरसोय

या पुलाच्या दुरुस्तीचं काम आजपासून सुरु झालं आहे. त्यामुळे दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत पूल बंद राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनाकडू सांगण्यात आलं आहे. पण, नागरिकांना याची पूर्वकल्पना नसल्याने या पुलाच्या खाली असलेल्या पर्यायी पुलावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. गर्दीमुळे प्रवाशांचा आरडाओरडा सुरु आहे.

लोअर परेल स्थानकातून बाहेर पडण्यासाठी एक पूल उपलब्ध आहे, पण तो लहान आहे. पूल उतरल्यावर खाली चिंचोळी गल्ली आहे, त्यातच रस्त्यावर बाईक पार्क असतात. तिथून बाहेर पडायला प्रवाशांना 20 ते 25 मिनिट लागत आहेत. रेल्वे पूल करण्याआधी प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतली नसल्याचं तसंच पर्यायी रस्ता उपलब्ध करुन दिला नसल्याचं यावरुन दिसत आहे. महापालिका काय करत आहे, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. तसेच प्रवाशांनी आणि नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

परदेशातून आलेल्या मुलाला आढळला मातेचा सांगाडा

News Desk

बेस्ट चालकाला बस चालवताना आला हृदयविकाराचा झटका

News Desk
राजकारण

गरीबांना अजून गरीब आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती | अजित पवार

News Desk

गरीबांना अजून गरीब करणे आणि श्रीमंतांना श्रीमंत करणे ही भाजपची नीती आहे. त्यामुळे अशा पक्षांना बाजुला करण्याचे काम आपल्या सर्वांना करायचे आहे, असे आवाहन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मंठा येथे बोलताना केले. हल्लाबोल आंदोलनातील जाहीर सभेत ते बोलत होते.

राज्यात ९ हजार गावे ५० पैशापेक्षा कमी आणेवारीवाली आहेत. त्यातील पाच हजार गावे मराठवाड्यातील आहेत. पण भाजपचे सरकार आल्यापासून त्यांच्या मंत्र्यांना शेतकरी आणि कामगारांच्या जीवनात काहीच बदल करता आलेला नाही. भाजपच्या मंत्र्यांनी केवळ जॅकेटची फॅशन आणली, असा खोचक टोमणा त्यांनी त्यांनी सरकारला मारला.

शिवसेना किंवा त्यांच्या प्रमुखांना शेतीतले काय कळते? फक्त शिवाजी महाराजांचे नाव घेऊन यांनी सत्ता मिळवली. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे काहीही काम केलेले नाही. या नाकर्त्या लोकांना बाजुला करण्यासाठी हे हल्लाबोल आंदोलन आहे, असे ते म्हणाले.

जालना जिल्ह्यात स्व. अंकुशराव टोपे यांनी सहकारी संस्था उत्तमरित्या चालविण्याचा आदर्श घालून दिला. राजेश टोपे त्यांच्याप्रमाणेच संस्थेचे काम पाहत आहेच. पण जालन्यातील इतर नेत्यांनी मात्र संस्था विकून खाल्ल्या, असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले की मंठा-परतूर मतदारसंघात होत असलेली सभा ही अभूतपूर्व अशीच म्हणावी लागेल. खाली-वर, इकडे-तिकडे कुठेही नजर मारली तर माणसंच माणसं दिसत आहे. घराच्या छपरावर बसूनही लोक सभेला उपस्थित आहेत. त्यामुळे ‘हवा का रुख बदल गया है’ हेच या सभेचे समर्पक वर्णन करता येईल.

भाजपच्या काळात अनेक मोठ मोठे उद्योग बंद होत आहेत. लोकांचे रोजगार जात आहेत. करोडो रुपये जाहीरातीवर खर्च करुन लोकांना फसवण्याचे काम भाजपने केले आहे. त्यामुळे भाजपचे ‘भारतीय जाहीरात पार्टी’ असे आता भाजपचे नामकरण करायला हवे, अशी टीका आमदार राजेश टोपे यांनी केली.

खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पण अद्याप पिक विम्याचे पैसे मिळालेले नाहीत. जर लवकर पैसे नाही मिळाले, तर आम्ही हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला.

मंठा येथील हल्लाबोल सभेला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, विधीमंडळ गटनेते जयंत पाटील, माजी मंत्री आ राजेश टोपे, आ. सतीश चव्हाण, आ. अमरसिंह पंडित, आ. अॅड. जयदेव गायकवाड, आ. विक्रम काळे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील, ओबीसी सेलचे राज्यप्रमुख ईश्वर बाळबुधे, राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे राज्यप्रमुख डॉ नरेंद्र काळे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश उपाध्यक्ष गुलाबराव गावंडे, विजय बोराडे, विलासराव लांडे उपस्थित होते.

Related posts

“बांठिया आयोगाच्या अहवालातील त्रुटींवर उपाययोजना करा”, छगन भुजबळ यांची मागणी

Aprna

प्रज्ञा ठाकूर यांना पुन्हा न्यायालयाचा दणका

News Desk

सचिन पायलट यांना काँग्रेसकडून नोटीस,आमदारकी धोक्यात ?

News Desk