HW News Marathi
महाराष्ट्र

मराठा आंदोलक आक्रमक, ‘महाराष्ट्र बंद’ची दिली हाक

मुंबई | मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आज ‘महाराष्ट्र बंद’ची हाक दिली आहे. औरंगाबादमध्ये आंदोलक तरुणाने गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली आहे. त्या पार्श्वभुमीवर मराठा क्रांती मोर्चाने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक रवींद्र पाटील यांनी ही माहिती दिली आहे.

आषाढी एकादशी निमित्ताने पंढरपुरात गेलेल्या वारकऱ्यांना घरी परतण्यास कोणताही प्रकारचा त्रास होऊ नये, म्हणून सातारा, पुणे, पंढपूर आणि मुंबईला बंदमधून वगळण्यात आले असल्याची माहिती मराठा मूक मोर्चा समन्वयक विरेंद्र पवार यांनी दिली आहे.

या बंदाच्या पार्श्वभुमीवर खबरदारी म्हणून मराठवाड्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी दिली आहे. गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली. या आंदोलक कार्यकर्ता काकासाहेब शिंदे यांना शहीद घोषित करून त्यांच्या कुटुंबीयांना १० लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निवडणुकांचे अंदाज बांधने बंद करा – राज्यमंत्री बच्चु कडू

News Desk

दिव्यांगांचे शिक्षण व विकासाचा बृहत आराखडा एक महिन्यात सादर होणार! – धनंजय मुंडे

Aprna

“…तर तुरुंगात बसून एसटीपण चालवू शकतील”, भाजपचा अनिल परबांना टोला

News Desk
मुंबई

कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तांत्रिक बिघाड, वाहतूक २० मिनिटे उशिराने

News Desk

मुंबई | कुर्ला ते विद्याविहार दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक काही काळासाठी बंद झाली आहे. धीम्या मार्गावरील वाहतूकही जलद मार्गावर वळविण्यात आली. तांत्रिक बिघाडामुळे सीएसटीच्या दिशेने येणारी मध्य रेल्वेची वाहतूक २० मिनिटे उशिराने सुरु आहे. त्यामुळे सकाळीच कामासाठी बाहेर पडलेलल्या चाकरमान्यांचे हाल होत आहेत.

मंगळवारी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी विद्याविहार ते कुर्ला या स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाला. यामुळे मुंबईकडे येणाऱ्या धीम्या मार्गावरील लोकल गाड्यांची वाहतूक खोळंबली. धीम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर वळवण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक पुन्हा एकदा कोलमडण्याची शक्यता आहे.

विद्याविहार ते शीव (सायन) स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर लोकल गाड्या खोळंबल्याने अनेक प्रवाशांनी ट्रॅकवरुन चालत जवळील स्टेशन गाठले. मध्य रेल्वेवर तांत्रिक बिघाडाचे सत्र सुरुच असून सोमवारी संध्याकाळी नाहूर स्थानकात एका लोकलमध्ये बिघाड झाल्याने कल्याणच्या दिशेने जाणारी धिमी लोकल सेवा विस्कळीत झाली होती. तर दुपारी कसारा स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related posts

पायधुनी पोलिसांकडून पाकिटमारी करणारी टोळी अटकेत

News Desk

राज्य आणि जिल्हा सहकारी बँकेत नोटबंदी दरम्यान अनियमितता,गोंधळ आणि भ्रष्टाचाराची माहिती नाही- आरबीआय

News Desk

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी केले बदल

News Desk