HW News Marathi
शिक्षण

सम्यक विद्यार्थी संघटनेची मुंबई विद्यापीठात निदर्शने

मुंबई | विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णया निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुंबई विद्यापीठा समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त न करता त्या मध्येच आवश्यक सुधारणा करण्यात याव्या अशी मागणी करत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याद्वारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांना निवेदन देण्यात आले.

प्रस्तावीत उच्च शिक्षण आयोगामध्ये अनेक त्रुटी असून सदर उच्च शिक्षण समितीतील सदस्यांची नेमणुक केंद्र सरकार करत असल्याने मोठ्या प्रमाणात नोकरशाह आणि राजकारण्यांचा यामध्ये हस्तक्षेप राहणार असून सदर समितीला मुक्तपणे काम करता येणार नाही. या उलट सरकारधार्जीन ही समिती राहणार असुन पुर्णता केंद्र सरकारच्या प्रभावाखाली उच्च शिक्षण समिती राहील. उच्च शिक्षण ओयोग गठीत करण्याचा निर्णय हा शिक्षण व्यवस्थेला एककेंद्रीकरणाचा असून हा निर्णय सरकारने एकाधिकारशाहीने घेतला आहे. असा अारोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अक्षय गुजर यांनी केला.

विश्व विद्यापीठ अनुदान आयागाचे आर्थिक अधिकारांची स्वायत्ता काढुन ते केंद्र सरकारकडे राहणार असल्याने महाविद्यालयांना अनुदान देताना निपक्षपातीपणाचा या ठीकाणी लवलेश ही राहणार नाही असे मत मुंबई सचिव आकाश दोडके यांनी मांडले.

त्याचप्रमाणे यापुर्वी महिविद्यालयांना संलग्नता देण्याचे अधिकार राज्यांना होते. परंतु सलंग्नता आता थेट उच्च शिक्षण आयोगाकडून मिळवावी लागणार. सदर अटी केवळ एककेंद्रीकरण दर्शवते असे मत सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रतीक साबळे(ठाणे अध्यक्ष) यांनी व्यक्त केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

तुम्हाला झेपत नसेल तर शिकू नका नोकरी करा !

News Desk

फोक्सवॅगन इंडियाकडून सिम्बॉयसिस स्किल्स अँड ओपन युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांना वेंटो कार भेट

News Desk

बारावीचा निकाल जाहीर, राज्यात मुलींची बाजी

News Desk
मुंबई

भाजपचे धारावीत खड्डे भरो आंदोलन

News Desk

मुंबई | भारतीय जनता पार्टीच्या मुंबई सचिव दिव्या ढोले यांच्या नेतृत्वाखाली आज धारावीतील प्रमुख रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्याचा (भरण्याचा) कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. खड्डे भरण्याची सुरुवात साहिल हॉटेल , संत रोहिदास मार्ग , ९० फिट रोड , येथे करण्यात आली होती . पावसामुळे धारावीतील रस्त्यांवर पडलेल्या खड्डयांकडे धारावीतील जनतेने शिवसेनेच्या ४ , काँग्रेसच्या २ , व राष्ट्रवादी कॉग्रेस चा १ असे ७ नगरसेवक , 1 काँग्रेस आमदार , १ शिवसेना खासदार निवडून दिलेला आहे.

परंतु धारावीतील मूलभूत नागरी सोयी सुविधांकडे या लोकप्रतिनिधींचे अक्षम्य दुर्लक्ष झालेले आहे . भाजपा ला जनता महत्वाची आहे. सर्व सामान्य नागरिक , आबालवृद्ध , गरोदर स्रिया , शालेय विद्यार्थी यांना जनतेला रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालवताना , चालताना रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे नाहक त्रास सहन करावा लागत होता. त्यांनी मनकेदुखी , पाठदुखी असे विविध प्रकारचे आजार उदभवत आहेत . त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी आज खड्डे भरो आंदोलन केले.

भारतीय जनता पार्टीच्या खड्डे भरो आंदोलनाची प्रेरणा घेऊन मुंबई महानगर पालिकेचे संबंधित अधिकारी व स्थानिक नगरसेवक , नगरसेविका , आमदार , खासदार आदी लोकप्रतिनिधी आम्हाला खड्डे भरताना बघून तरी जागृत होऊन जनतेच्या सोयी, सुविधा आणि सुरक्षा ह्या कडे लक्ष देतील अशी अपेक्षा यावेळी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. यावेळी भाजपाच्या मुंबई सचिव दिव्या ढोले,रिजवान पटेल, नेहाल वारीस,जुबेर शेख,भरत शर्मा,संजय गुप्ता,रमेश कुलुर,हासमुखवाला,आरती भोसले,योगिता पांचाळ,सलमा शेख आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Related posts

जाहिरात क्षेत्रात काम करणाऱ्या भूमिका सिंगची आत्महत्या

News Desk

उबरचे मुंबईतील कार्यालय कायमस्वरूपी बंद

News Desk

भुजबळांना केईएम मधून डिस्चार्ज

News Desk