HW News Marathi
महाराष्ट्र

विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमदारांचे घंटानाद आंदोलन

नागपूर | राज्यभर सुरू असलेल्या दूध आंदोलनाला आता राष्ट्रवादी आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी दूध उत्पादकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घंटानाद आंदोलन केले आहे.

दूध उत्पादकांचे आंदोलन आज राज्यभर तीव्र झाले असून त्याचे पडसाद आज दोन्ही सभागृहात उमटले. सभागृहामध्ये सरकारकडून दूध उत्पादकांना योग्य तो हमीभाव मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आक्रमक झाले आणि त्यांच्यासोबत काँग्रेस आणि शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आणि विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येवून घंटा वाजवून जोरदार आंदोलन केले. घंटानाद आंदोलनामुळे विधानभवनाचा परिसर दणाणून गेला.

यावेळी विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, आमदार राजेश टोपे, आमदार शशिकांत शिंदे, आमदार हसन मुश्रीफ, आमदार विजय भाबळे, आमदार संजय कदम, आमदार मधुसुदन केंद्रे, आमदार प्रदीप नाईक आदींसह काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जरंडेश्वर साखर कारखान्यावरील ED कारवाईवर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…

News Desk

पोलीस उप निरिक्षक परीक्षेत नागनाथ तुकडे आणि अजय लोहेकर उतीर्ण

News Desk

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

Aprna
राजकारण

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

News Desk

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदी सरकार देशातील गरीबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत. लोकांच्या भावना विरोधक राजकीय व्यासपीठावर मांडत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले तरी देशात पेट्रोलचे दर महाग आहेत.

हा पैसा थेट श्रीमंतांच्या खिशात जात आहे. देशातील श्रीमंतांसाठी सरकार काम करत आहे, त्यांची कर्जे माफ केली जात आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीतंर्गत आणावेत अशी आमची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडून दुर्लक्ष करत होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. दरम्यान, राहुल गांधी आज चंद्रपुरात दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत.

Related posts

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk

राजकीय नेत्यांनी केला वायूदलाला सलाम

News Desk

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

News Desk