HW News Marathi
महाराष्ट्र

दूध पुरवठा सुरळीत राहणार | मुख्यमंत्री

नागपूर | दूध पुरवठा सुरळीत राहणार असून राज्यात तुटवडा निर्माण होऊ देणार नाही. असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनने आज राज्यभर दूध आंदोलना सुरु झाले आहे. या दूध आंदोलनाचा परिणाम आज जाणवत नसला तरी, उद्या या आंदोलनाचा परिणाम ग्राहकांना जाणवेल.

खासदार राजू शेट्टी यांनी पंढरपुरात विठ्ठलाला दुग्धाभिषेक करून महाराष्ट्र राज्यात दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांची दरवाढ द्यावी, अशी मागणी करत आंदोलन सुरू केले. महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, औरंगाबाद परिसरात मोठ्या प्रमाणात दुधाचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तर या आंदोलनाला पुण्यात हिंसक वळण लागले असून आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावर दूध फेकले आहे.

राज्यात रविवारी रात्री १२ वाजल्यापासून दुधाचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. राज्यात ठिकठिकाणी दुधाचे टँकर अडविण्यात आले. हे आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारने कंबर कसली असून आंदोलकांची धरपकड सुरू केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुंबईच्या हद्दीत ८ मार्चपर्यंत जमावबंदी आदेश जारी

Aprna

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात दाखल, क्रिटीकल शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची वकिलांची माहिती!

News Desk

MNS वसंत मोरेंना मुख्यमंत्र्यांनी भेटीसाठी बोलावले, तर मनसेच्या 4 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Aprna
क्राइम

वडिलांनीच केली मुलीची हत्या

swarit

सोलापूरतेलंगणामधील ऑनर किलिंगच्या घटनेने संपुर्ण देशाला हदरवून टाकले होते. या घटनेची पुनरावृत्ती महाराष्ट्रातील सोलापूरमध्ये झाली आहे. शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलासोबत लग्न केल्यामुळे ही हत्या करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. वडील आणि आई या दोघांनी आपल्या मुलीची हत्त्या केली. आरोपी वडील विठ्ठल धोंडिबा बिराजदार आणि आई श्रीदेवी बिराजदार यांना पोलिसांनी शुक्रवारी अटक केले आहे.

अशी झाली अनुराधाची हत्या

अनुराधा ही कर्नाटकमध्ये वैद्यकीय( बी.ए.एम.एस.) शिक्षण घेत होती. तिने शेतात काम करणाऱ्या सालगड्याच्या मुलासोबत लग्न केले होते. अनुराधाच्या वडिलांना हे कळताच ते तिला कर्नाटकातून घरी घेऊन आले. आणि अनुराधाचे मामा बाळासाहेब म्हमाणे हे बोराळमध्ये राहत होते. अनुराधाला तिच्या वडिलांनी मामाच्या घरी सोडून आले. थोड्या दिवसांनी अनुराधाची तोंडी परीक्षा असल्याचे कारण सांगून तिला बोरालमधून ४ ऑक्टोबरला घरी घेऊन आले. अनुराधा ५ ऑक्टोबरला शेतात हत्या केल्यानंतर तिथेच तिच्यावर अंत्यसंस्कार केले.

अनुराधाने मृत्यूपूर्वी दोन चिठ्ठ्या लिहून ठेवल्या होत्या. त्यात चिठ्ठीत लिहले होत की, “माझ्या आई-वडिलांपासून माझ्या जीवाला धोका आहे. माझ्या जीवाचे बर-वाईट झाल्यास माझ्या आई वडिलांना जवाबदार ठरवा,” अनुराधाच्या मामाने या घटनेची तक्रार पोलिसांना केली. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.

Related posts

अल्पवयीन मुलाचे अपहरण, पोलिसांनी अवघ्या 36 तासात शोधून काढले

News Desk

गळफास घेवून तरुण शेतक-याची आत्महत्या

News Desk

मलिकांच्या आरोपानंतर आता वादात अमृता फडणवीसांची उडी…

News Desk