HW News Marathi
महाराष्ट्र

पुण्याच्या मल्टिप्लेक्स मॅनेजरला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे | मल्टिप्लेक्सच्या मनमानी कारभाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सिनेमागृहाच्या व्यवस्थापक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली. पुण्यात गुरुवारी दुपारच्या सुमारास सेनापती बापट रस्त्यावर असलेल्या पीव्हीआरमध्ये या सिनेमागृहात ५ रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता अशी विचारणा करत मनसे कार्यकर्त्यांनी मारहाण केली. यात मनसेचे उपाध्यक्ष रमेश परदेशी आणि पुण्यातील मनसे कार्यकर्त्यांचा समावेश होता.

मल्टिप्लेक्समध्ये खाद्यपदार्थांच्या किंमती अव्वाच्या सव्वा दराने विकत असल्यामुळे नुकतेच उच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. न्यायलायाने निर्णय दिल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाऊन पॉपकॉर्नचे दर तपासले. त्यानंतर मनसे कार्मचाऱ्यांनी मल्टिप्लेक्समध्ये जाणून मारहाण केली. मनसेच्या १० ते १५ कार्यकर्त्यांच्या विरोधात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला असून या कार्यकर्त्यांना एक दिवसीय कोठडी सुनावण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

शॉक लागून दाम्पत्य ठार

News Desk

कोकणाचा शाश्वत विकास पूर्ण करणार! – आदित्य ठाकरे

Aprna

मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना लिहिलेल्या पत्रावरुन फडणवीसांचा टोला!

News Desk
मुंबई

मुलुंड-ऐरोली टोलनाक्यांवरील टोल वसुली महिन्याभरासाठी बंद

swarit

मुंबई | मुंब्रा बायपास रोडचे काम सुरु असल्याने मुलुंडमधील दोन टोलनाके तर ऐरोलीतील एक टोलनाक्यांवरची टोलवसुली बंद करण्यात आली आहे. परंतु ही टोलवसुली फक्त लहान वाहनांसाठी बंद करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत प्रवाशांना होणाऱ्या मनस्तापामुळे राज्य सरकारकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ही टोलवसुली साधारण महिन्याभरासाठी बंद राहील. म्हणजेच २१ ऑगस्ट ते २३ सप्टेंबर पर्यंत लहान वाहनांची टोल वसुली बंद राहील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ विभागाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ही टोलवसुली बंद करण्याची मागणी करून स्वतः देखील हे टोलनाके बंद पडण्याचा प्रयत्न केला होता.

Related posts

लोकल अजूनही रुळांवर येईना!

News Desk

मुंबईत आजचा पारा 13.8 अंशावर पोहोचला

Aprna

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

News Desk