HW News Marathi
मुंबई

डबेवाल्यांची जागा बळकावली कुणी ?

मुंबई | मुंबईचे डबेवाले गेली १२८ वर्षे मुंबई शहरात जेवणाचे डबे पोहचविण्याचे काम करत आहेत. सायकल च्या मदतीने घरोघरचे जेवणाचे डबे हे डबेवाले जमा करतात आणि ते डबे रेल्वे स्थानकात घेऊन योतात. मग या डब्यांची रेल्वे स्थानकाबाहेरील काही ठराविक जागी डब्यांची अदला बदल केली जाते. यातल्या काही जागा तर जवळ जवळ शंभर वर्षांपासून मुंबईचे डबेवाले वापरत आहेत. पण कोणत्याही जागेवर डबेवाल्यांनी अद्याप अतिक्रमण केलेले नाही.

परंतु कांदिवली पश्चिम येथील कमला नेहरू मार्ग फुटपाथवर गेल्या अनेक वर्षांपासून डबेवाल्यांची बदलीची जागा होती. सध्या या फुटपाथवर अनधिकृत मोटार सायकल पार्क केल्या जात असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे डबेवाल्यांची बदलीची जागाच त्यांनी बळकावली असल्याचा आरोप मुंबईच्या डबेवाल्यांकडून होत आहे. डबेवाल्यांनी याची तक्रार वहातूक पोलीस विभाग कांदिवली यांच्याकडे केली असता त्यांनी सांगितले गाड्या फुटपाथवर पार्क केल्या आहेत आम्ही कारवाई करू शकत नाही. तसेच या गाड्यांवर कारवाई फक्त मुंबई महानगर पालिका करू शकते. या गाड्या हटवायच्या असतील तर मुंबई महानगर पालिकेकडे तुम्ही तक्रार करा. अशा प्रकारे वहातूक पोलिसांनी मुंबईच्या डबेवाल्यांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

मुंबई शहरात फुटपाथवर गाड्या पार्क केल्या असल्या व त्यांची तक्रार आली तर वहातूक विभागाकडून तात्काळ कारवाई केली जाते. मग मुंबई उपनगरात ही कारवाई वहातूक पोलिस का करत नाहीत ? या प्रकरणात अनधिकृत मोटार सायकल पार्क केलेल्या मोटार सायकल ह्या बहुतांश पोलिसांच्याच आहेत.(किमान तसे स्टिकर त्यांचेवर लावले आहेत.) म्हणुन वहातुक पोलिस कारवाई करत नसावेत. मग आता आम्ही याची दाद मागायची कुणाकडे असा सवाल मुंबई डबेवाला असोसिएशनचे प्रवक्ते सुभाष तळेकर यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मुख्यमंत्र्यांच्या इशाराऱ्यावर सरकार पोरकटपणे वागत आहे | जयंत पाटील

News Desk

मुंबईच्या समुद्रात तीन मुले बुडाली

News Desk

मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘पालकमंत्री आपल्या भेटीला’ या उपक्रमास एन वॉर्ड मधून आजपासून सुरुवात

Aprna
राजकारण

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या 24 वर्धापन दिनी रिपाइंतर्फे जाहीर अभिवादन सभा

News Desk

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठनामांतराच्या 24 व्या वर्धापन दिनी रिपब्लिकनपक्षाच्या वतीने जाहीर अभिवादन सभेचेआयोजन दि 14 जानेवारी रोजी सायंकाळी 6वाजता करण्यात आले आहे. ही जाहीर सभा औरंगाबाद मध्ये विद्यापीठाच्या ऐतिहासिककमान असलेल्या प्रवेशद्वाराजवळील डॉ. आंबेडकर कॉमर्स कॉलेजच्या प्रांगणातआयोजित करण्यात आली आहे.

या सभेसरिपाइं चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्यायराज्यमंत्री रामदास आठवले ;राज्याचे सामाजिकन्यायमंत्री राजकुमार बडोले आणि पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर प्रामुख्याने उपस्थितराहणार असल्याची माहिती रिपाइंचे महाराष्ट्रप्रदेश कार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिलीआहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडाविद्यापीठाचा नामांतर लढा 17 वर्ष आंबेडकरीजनतेने लढवीला.

प्रचंड संघर्ष आणिअनेकांच्या बलीदानातून नामांतर साकारले.त्याप्रित्यर्थ नामांतर लढ्याचा विजय आणिनामांतर लढ्यातील शाहिदांना अभिवादनकरण्यासाठी मागील 23 वर्ष सातत्याने रिपाइंतर्फे अभिवादन सभा विद्यापीठ प्रवेशद्वाराजवळऔरंगाबाद मध्ये आयोजित केली जाते यंदा याअभिवादन सभेचे हे 24 वे वर्ष असल्याचीमाहिती या सभेचे संयोजक रिपाइं चे राज्यकार्याध्यक्ष बाबुराव कदम यांनी दिली.

केंद्रीयमंत्री रामदास आठवले याचे मोठे योगदान राहिलेअसून नामांतराचे शिल्पकार म्हणून त्यांनागौरविण्यात आले आहे. त्यामुळे राज्यभररिपब्लिकन पक्षातर्फे प्रत्येक तालुक्यात ;गावातनामांतर दिन साजरा करण्याचे आवाहन सर्वकार्यकर्त्यांना रिपाइंतर्फे अधिकृतरित्याकरण्यात

Related posts

नितीन गडकरींना पुन्हा एकदा व्यासपीठावर आली भोवळ

News Desk

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या उद्ध्वस्त धर्मशाळेतून बरेच लोक भाजपच्या पक्क्या घरात प्रवेश !

News Desk

‘सिल्वर ओक’वर शरद पवार-प्रफुल्ल पटेलांमध्ये चर्चा सुरु

News Desk